Saturday, April 11, 2020

सद्गुरूंचे आभार कधी मानलेच नाही

सदगुरु सर्वच आपल्याकडून चांगल्या गोष्टी करून घेतात ,आज अनुभूतीवर निलम ताईने सत्संग विचार पोस्ट केली.त्यात त्यांनी पोस्ट approve केली म्हणून आभार मानले ,त्यात नंतर त्या म्हणाल्या पोस्ट approve केल्याने सद्गुरुंचे विचार सर्वांपर्यंत पोचतात त्यासाठी आभार मानायला हवेतच हे मेघनाताई यांच्याकडून शिकले, हे वाचल्यावर लगेच मनात खालील ओळी सद्गुरूप्रेरणेने सुचल्या ,की कित्ती गोष्टी आपल्याला देऊनही सद्गुरूंचे आभार कधी मानतच नाही.


देती सदगुरु शुद्ध हवा पाणी ,
देती सदगुरु लोकसंग्रह विपुल
तेच देती विचार करण्याची बुद्धी
त्यांचे कधी आभार मानले नाही

सदगुरु आयोजिती सत्संग विचार
पोचविती अमूढाप्रति विनासायास
घेती करून उजळणी वारंवार
त्यांचे आभार कधी मानलेच नाही

सदगुरु प्रत्यक्ष परब्रम्ह अवतार
श्रेष्ठ असती दैवताआधीही पूज्य
हसून करिती चौकशी या जीवाची
तरीही कधी आभार मानलेच नाही

एवढे अक्षम्य चुका करूनही
संधी देती वेळोवेळी माफ करोनी
केले श्रीमंत देऊनी नामसाधने
तरी कधी आभार मानलेच नाही

आता तरी होऊनीया जागृत
सदगुरुना करू नामातून वंदन
जपुनी अमर्याद दिलेले साधन
करू सदगुरुना आभार प्रदर्शन

No comments: