आमच्या डिप्लोमा मित्रांचा whatsapp वर ग्रुप बनवला
त्यावेळी डोक्यात होते की पूर्ण ग्रुप नाही पण जेवढे आता आहेत तेवढे गप्पा मारू आणी शेरिंग करू
ग्रुप तयार झाला त्यावेळी सर्वाना गेट टुगेदर करायचे वेध लागले होते त्यामुळ गप्पाना ओघ आला होता
मेसेज चा महापुर म्हटला तरी चालेल कारण 2-3तासानंतर जरी whatsapp चालू केले तरी 100-150 मेसेज आधी वाचुन संपवायचे आणि मग त्यावर कमेन्ट करायच्या
एकदम धमाल खुप मजा पण यायला लागली
गेट टुगेदर झाले त्यानंतर मात्र मेसेजला गळती लागली
वाटले की उत्साह संपला वाटते ग्रुप मध्ये गप्पा मारण्याचा पण त्यानंतर पण गप्पा चालूच राहिल्या कधी एकमेकाना शिव्या घालणे ,एकमेकांची ऊणी दूणी काढायची ही कामे रोजचीच
पण या गप्पामधुन एक वेगळीच उर्जा मिळते रोजच्या रोज
जुन्या काळी जे सण समारंभ याच साठी असायाचे की त्या निमित्ताने सर्व मित्र परिवार एकत्र येइल, शेरिंग होइल ,गप्पा होतील ,विषयांचे आदान प्रदान होइल
गप्पा आणि गप्प एकदम एकसारखे शब्द पण एकदम भिन्न गोष्टी
गप्पा मारताना गप्प बसणे मुश्किल आणि गप्प बसणार्याशी एखादा गप्पा मारण्याचा विचार पण नाही करणार
गप्पा शब्दाची व्युत्पत्ति पण कशी झाली असेल तर काही लोक एकत्र येवून खुप बोलत असतील ,बडबडत असतील तेव्हा ज्याला असह्य झालाय हा गोंगाट असा माणुस ओरडला असेल अरे गपा
म्हणजे गप्प बसा
अर्थात हा माझा अंदाज आहे तेव्हा सप्रमाण पुरावा माझ्याकडे काहीही नाही
जुन्या काळी चावडीवर सर्व लोक जमून गप्पा मारायचे त्यालाच मग गावगप्पा म्हणायला लागले
काळ बदलला आणि कम्पूटर आणि इंटरनेट मुळे माणसाच्या गप्पाना नविन माध्यम मिळाले
मला आठवतय की साधारण 1998 पासुन इंटरनेट सायबर केफे मधून सर्वासामान्यांच्या आवाक्यात आले अर्थात तेव्हाही 15रु प्रति तास इंटरनेट असुनही ईमेल व याहू मेसेंजर वरुन तासंतास गप्पा मारनारे ग्रुप तयार झाले
अनोळखी माणसाशी गप्पा मारण्याचा याहू मेसेंजर सारखा मिडिया लोकप्रिय व्हायला लागला होता
सोबत होटमेल Icq रेडिफबोल सारखे नविन मेसेंजरही होतेच
नंतरच्या 4-5 वर्षात प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आणि sms हा गप्पा मारण्याचा नविन फंडा मिळाला जो 2008 पर्यन्त कौलेज तरुण वर्गाचा आवडता साधानान्पैकी एक झाला
2011 2012 उजाडले आणि एंड्राइड युग चालु झाले
माणुस आधुनिक झाला हातात स्मार्टफोन आणि लैपटॉप आला तसा गप्पा मारण्याचा मिडिया पण मोठा झाला
फेसबुक ,ट्विटर ,gtalk,whataapp ही आताची साधने म्हणजे गप्पा मारण्याची नवी ठिकाने ,अड्डे ,चावडी होउ लागली
फेसबुक तर जुन्या मित्राना शोधून पुन्हा त्यांच्याशी नाळ जोड़ण्याचा आणि गप्पा मारण्यासाठी like comment करणारे मित्रही वाढले
A जर b चा मित्र आणि b असेल c चा मित्र तर आपोआप a हा c चा मित्र व्हायला लागला
नविन आलेले wechat किंवा hangout सारखे अप्प्स तर voice chat व video chat सारख्या सुविधा फुकट मध्ये द्यायला लागलेत
viber ,skype सारखे अप्प्स मुळे कितीही लांब व्यक्तिशी कमी खर्चात गप्पा मारण्याची सुविधा मिळाली
साधने वाढली पण त्यामुळे खरच गप्पा वाढल्या??
नात्यांमधली दरी भरायला ह्या गप्पा उपयोगी ठरायला लागल्या का?
पूर्वी घराघरात दिसणारा संवाद या नविन माध्यमांमूळे वाढला की बिघडला???
उत्तरे व्यक्तिसापेक्ष वेगळी असतीलही
पण जेवढी माध्यमे वाढली तेवढया पटित गप्पा आणि संवाद कमी झाला हेही तेवढेच सत्य आहे
जगाला कवेत घेत जगाशी गप्पा वाढल्या असतीलही पण एकत्र जेवताना घराच्यान्शी मारलेल्या गप्पा शुन्य झाल्यात आणि हीच खंत आहे आपल्या वडीलधारर्यांची
कामावरून घरी आल्यावर चहा घेता घेता आईशी, बायकोशी गप्पा मारणे कमी झालय
आपल्या मुलाशी बोबड्या भाषेत गप्पा मारण्यापेक्षाही महत्वाचे ठरते ट्विट्स आणि फेसबुक अपडेट्स
दूरचा मित्र काय करतोय हे अपडेट्स मिळतात पण शेजारी आजारी असून होस्पिटलमध्ये एडमिट आहे हे समजायला आठवडा जातो
जग जवळ आले म्हणतात पण मने मात्र खुप दूर जायला लागली आहेत
हीच धोक्याची घंटा वाजायला लागली आहे असे वाटायला लागले आहे
माध्यम वाढूनही गप्पांचे रूपांतर गप्प मध्ये होते काय??
जर असे असेल तर प्रत्येकाने गप्पा आपल्या घरातल्या माणसापासून सुरु करायला हवे
मग काय मित्रानो पटले ना????
-- निलेश जोशी