सदगुरु श्री काकामहाराज (श्री. श्रीपाद अनंत वैद्य) हे जीवनात अनवधानाकडून सावधानतेकडे जाण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग अवलंबायला सांगतात. नाम घ्याच पण नुसते नामस्मरण नाही तर नाम घेताना डोळे मिटून, आपल्या आत डोकवायचे आहे.माझ्यात काय दुर्गुण आहेत व ते घालवायला काय करायला लागेल, याचा आढावा घ्यायचा.
असं म्हणतात की एखादी सवय स्वतःला लावायची असेल तर 21 दिवस सातत्याने ती गोष्ट करायला हवी.
ज्या काही उणीवा आपल्यात असतील, त्या ओळखून यावरचे उपाय 21 दिवसात अंमलात आणून आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.पुढील 21 दिवस घरातच बसायचे आहे त्यामुळे आज चैत्र पाडवा अर्थात नववर्ष संकल्प करून तो पुढील 21 दिवस घरातूनच सातत्याने पाळूया.
इतर वेळीही रोजच्या कामकाजात व्यग्र असताना श्रीसदगुरु सतत बघत आहेत,लक्ष ठेवुन आहेत ही जाणीव जागृत ठेवायची.आपल्याकडून कळत नकळत अनेक चूका होत असतात ,श्रीसदगुरु बघत आहेत ही जाणीव ठेवल्याने त्या कमी व्हायला लागतात.श्रीसदगुरु काकामहाराज म्हणतात मी तुमच्यातच आहे मग या देहात ,हृदयात त्यांचे अस्तित्व आहेच व स्वच्छ अंतर्मनात त्यांचा वास आहे पण त्याची जाणीव व्हायला हवी असेल व तिथपर्यंत पोचायला आपले बाह्यमन स्वच्छ करायला नको का?आपले बाह्यमन झाडायला नाम व नाम जपाच्या साह्याने बनवलेली काड्यांची झाडू हवी म्हणजेच जर माझे कमी नाम होतंय तर झाडूदेखील कमी काड्यांची बनेल व अर्थातच माझ्या बाह्यमनाची सफाई व्यवस्थित होणार नाही.
तसेच सर्व नामधारकांनी हे करायला हवे की रोज झोपण्यापूर्वी श्रीसदगुरुंना डोळ्यासमोर आणून,त्यांना साक्षी ठेवून पूर्ण दिवसभरातील आपला वावर ,प्रवास ,बोलणे ,कोणाशी कसे बोललो हे सगळे rewind करायचे.त्यातून बरेच शिकायला मिळते ,अंशरूपाने शिक्षण मिळते की या ठिकाणी मी उगाच चिडलो ,मी या वेळी असे नाही वागायला हवे होते ,अरे मी असे बोललो आणि कदाचित तो दुखावला गेला असेल ,अरे त्याला मी टोचून बोललो पण त्यांच्यातही श्रीसद्गुरुस्वरूप आहेच ,त्याला तो मेसेज वेगळ्या शब्दात देऊच शकलो असतो. अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे Gratitude व्यक्त करणे ,आजच्या पूर्ण दिवसात जेव्हा जाणवते मी चुकीचे वागलो ,तेव्हा श्रीसद्गुरूंना साक्षी मानून ठरवायचे मी ती चूक भविष्यात टाळायचा मनोमन प्रयत्न करेन आणि जर ती व्यक्ती माझ्यामुळे दुखावली असेल तर मनोमन मी त्यांची माफी मागत आहे. अनेकदा
आपल्याशी जी व्यक्ती rude वागत आहे त्यामागे आपल्या मागील जन्मातील काही चुका आहेत आणि त्या चुकांचे प्रायश्चित आता आपण घेत आहोत असा विचार आणला की आपोआप त्या व्यक्तीबद्दल अढी निघून जायला मदत होते. भूतकाळातील, पूर्वजन्मातील चुका मी नाही सुधारू शकत त्यामुळे आता त्याचे प्रायश्चित घेऊ आणि आपण वर्तमानकाळात आपली कर्मे कशी शुद्ध होतील याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो.
*आपल्या साईकाका परिवारातील सर्व बंधु भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
*परमपूज्य शिवस्वरूप सदगुरु श्री काकामहाराज व सौ काकुमाऊली यांना हृदयापासून नमस्कार*
जय साईराम
No comments:
Post a Comment