#दिव्यानुभव
आज बरोबर एक वर्ष झाले,मागच्या 17 जानेवारीला माझे दुसरे ओपेरेशन झाले.याआधी मी पोस्ट केल्याच आहेत की दोनचाकीवर अपघात झाला व तेव्हा हाताच्या फ्रॅक्चरवर रॉड टाकावा लागला.तेव्हा रिकव्हर झालो व कामावर जॉईन झालो.त्यांनतर 6 महिन्यांनी पुन्हा हातात दुखायला लागले व साधे पेनही उचलण्याची ताकत नव्हती.xray काढल्यावर समजले की आधीच्या रोडचे स्क्रू बाहेर आलेत व पुन्हा ऑपरेशन करावेच लागेल.आधीच सुट्ट्या झाल्याने आर्थिक स्थिती नाजूक त्यात पुन्हा ऑपरेशन व रिकव्हरी रेस्ट परवाडणारी नव्हती तरीही आवश्यक कारण डॉ म्हंटले जास्त उशीर केला तर ते स्क्रू त्वचेतून बाहेर येऊ शकतात व परमनंट अपंगत्व येऊ शकते. उजवा हात असल्याने अजून टेन्शन. त्याचदरम्यान मला विचित्र स्वप्न पडू लागली की ऑपरेशन चालू असताना माझी शुद्ध हरपली व मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्याने मी कोमात जातोय etc etc.
खूप घाबरलो ,आता फक्त स्वामी आधार होते व त्याच दरम्यान आपले समूह सदस्य सचिन यांच्याशी मेसेंजरवर बोलणे झाले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमान वडवानल स्तोत्र वाचायला लागलो.16 जाने.ला ऍडमिट झालो व मी व बायको एकमेकांना धीर देतोय. स्वामीकृपेने जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी दाखवली हॉस्पिटल ला , तेव्हा त्यांनी मेडिक्लेमसाठी अर्ज केला. मला वाटत होते की माझी पॉलिसीवर 1 लाखाची मर्यादा आहे कारण याआधीच्या सर्व बोलण्यात एक लाख शब्द वापरलेला ,पण हॉस्पिटल मेडिक्लेम टीमने त्यांच्या कम्प्युटर डेटानुसार माझी पॉलिसी मर्यादा 10 लाख आहे असे सांगितले (स्वामींनी एक शून्य वाढवले बहुतेक) व सर्व रिपोर्ट्स त्यांना पाठवल्यावर आधीच 4 लाखपर्यंत मंजूर झाले व अजून काही कोम्प्लेक्सिटी आली तर वाढवून मिळेल असे लेटर होते.आता पैश्याचे काही टेन्शन नव्हते.व डीलक्स रूम मिळाल्याने जास्त टेन्शन नव्हते.
ऍडमिट झालो तर डॉ म्हणाले काही चाचण्या करून त्याच्या रिपोर्टनुसार ऑपरेशन डेट ठरवू. लगेच ब्लड,युरिन सॅम्पल घेतले.xray व इतर चाचण्या पुन्हा केल्या व संध्याकाळी आम्ही निवांत होतो. रात्रौ 9 वाजता नर्स म्हणाली ,आता पेशंटने काहीच खायचे नाही ,पाणी प्यायचे नाही सकाळी 7 ला ऑपरेशन आहे,सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत.
आम्ही अचंबित आणि टेन्शन मध्ये ,मी तर रात्रीच जप चालू केला व वडवानल स्तोत्र पाठ चालू केले.सकाळ झाली ,8 वाजले तरी कोणी येईना म्हणून विचारले तर सकाळची 3 ऑपरेशन उशिरा चालू झाली त्यामुळे माझे साधारण 10 ला होईल ,10 चे 11,12,1 झाला व 1 वाजता मला घेऊन गेले. प्रिपेर्शन रूम मध्ये पुन्हा पाऊण तास गेला व नंतर ऑपरेशन थिएटरला नेले तर तेथील मावशींनी रिपोटचा चुकीचा वापर केला आणि टेबल तिरक्या दिशेने लॉक झाले. माझ्या भुलीची सर्वच तयारी झाली होती. पुन्हा मला प्रिप्रेशन रूमला आणले,20 मिनिटांनी पुन्हा थिएटर ,या सगळ्या वेळेत खूप टेन्शन आले ,मनातल्या मनात जप चालूच होता व एकदाची मला भूल दिली.ऑपरेशन झाले व 8 तासांनी शुद्धीवर आलो,डॉ पण भेटून गेले व दुसया दिवशी जे काही समजले ते हादरावणारे होते व स्वामीकृपा अनुभवायला मिळाली. मनोमन स्वामींचे आभार मानले.
डॉ च्या मते ,माझ्या हाताच्या नसा ,शिरा मॅच होणे खूप महत्वाचे होते व ते नसते झाले तर अपंगत्व येऊ शकले असते ,त्यांच्यामते दुसऱ्या शस्त्रक्रियेत हा धोका जास्त असतो. माझा हात ,बोटे आता छान मूव्ह होत होता.
आधीचा रॉड काढण्यात खूप प्रॉब्लेम आलेले व डॉ ना टेन्शन की माझी भूल नको उतरायला,
3 तासाचे ओपेरेशन साडेपाच तास चालले म्हणून घरचे टेन्शन मध्ये होते,
ऑपरेशन संपल्यावर अचानक सर्वची धावपळ झाली कारण माझा श्वास अपुरा पडत होता व ऑक्सिजन लावावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान माझे बीपी व शुगर एकदम वाढली होती त्यामुळे 2 वेळ भूल डोस बदलून द्यावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान जुन्या रॉडचे स्क्रू निघत नव्हते ,स्लिप झाल्याने व रक्तस्राव खूप झाला ,5 बाटल्या रक्त द्यावे लागले.
सर्वांच्या मते खूपच क्रिटिकल ऑपरेशन पार पडले व डॉ म्हणाले माझ्या 10 वर्षातील एक चॅलेंजिग ऑपरेशन होते.
थोडक्यात स्वामी कृपा व हनुमान वडवानल स्तोत्र प्रभावाने मी यातून सहीसलामत बचावलो होतो व आता हात व्यवस्थित असून नित्य कामे करताना काहीही त्रास होत नाही.
श्री स्वामी समर्थ,ओम् श्री साईनाथाय नमः
-- निलेश जोशी