सदगुरु कायम म्हणतात , कोणतीही गोष्ट करण्याआधी ,कोणाला हुकूम देण्याआधी सद्गुरुचे स्मरण करा , नामस्मरण करा आणि मग ती गोष्ट करा ,बघा परिणाम नक्कीच दिसेल.
हे सर्व कळतंय पण अंमलात कसे आणायचे ? 2 दिवस परिवर्तन या ट्रेनिंगमध्ये आहे ,त्यात स्टीफन कोव्ही यांच्या 7 हेबीट्स फॉर हायली इफेक्टिव्ह पीपल मधील पहिली स्टेप आहे ,त्या स्टेपचे नाव *बी प्रोऍक्टिव्ह*
यांत पहिली गोष्ट शिकायला मिळाली ,जी सदगुरु नेहमी सांगतात, कोणत्याही गोष्टीची ,क्रियेची (Stimulus)प्रतिक्रिया(respond) देताना एक Pause घ्या , आणि मग विचार करून प्रतिक्रिया द्या ,म्हणजे तो फ्लो stimulus --> Pause --> Respond असा व्हायला हवा, हा Pause म्हणजेच सद्गुरूंचे स्मरण ,नामाचे स्मरण आणि हे केल्याने आपले उत्तर बदलते.या pause घ्यायचा सराव होण्यासाठी ट्रेनरनी एक छोटा खेळ घेतला ,त्यात ट्रेनर तोंडाने मोठा बॉल असे बोलले तर समोरच्याने विरुद्धार्थी बोलायचे म्हणजे लहान बॉल पण हाताने action मात्र मोठ्या बॉलची दाखवायची . आता या पूर्ण खेळात खुप चूका व्हायच्या कारण आपण सवयीने respond करायला जातो. पण जेव्हा त्यांनी मुद्दाम pause घेऊन विचार करून खेळ खेळायला लावला तेव्हा खेळात चुका झाल्याचं नाहीत.
म्हणजेच सदगुरु म्हणतात तसे प्रत्येक छोट्या छोट्या respond करताना आपण सदगुरु स्मरण व नामस्मरण करायला लागलो तर आपोआपच हा pause घेणे पण साध्य होईल व नामस्मरण सुद्धा होईल. आपल्या प्रतिक्रिया बदलतील आणि आपल्याही चुका होणे बंद होत जाईल. हे सर्व अर्थातच सरावाने ,आणि त्यासाठी सदगुरु म्हणतात की प्रत्येक कामात ,मधल्या वेळेत नामस्मरण करा.
तसेच अजून एक गोष्ट आहे जी सदगुरु तंतोतंत सदगुरु त्रिसूत्रीतुन सांगतात जी आहे Circle of Concerns,यांत
आपण आपल्या समस्या लिहून काढायच्या आणि त्याच्यात विभागणी करायची की माझ्या प्रभावात किंवा माझ्या कंट्रोल मध्ये किती समस्या येतात ?
त्या म्हणजे खरच मी त्यावर काम करू शकतो.माझ्यात बदल घडवून आणू शकतो.
काही समस्या ज्याच्यात माझा कंट्रोल ,प्रभाव असू शकत नाही त्यांना बाजूला काढायचे . असे केल्यावर जाणवते आपण बऱ्याच गोष्टींचा समस्या असे बघून आपल्यावरच ताण घेतो ,कारण ताण घेऊनही आपण त्यात काहीच करू शकत नाही जसे प्रदूषण , पर्यावरण ,पाकिस्तान हमला.
सदगुरु नेमके हेच सांगतात की माझ्यावर विश्वास ठेवून सर्व माझ्यावर सोडून दे , त्रिसूत्री बघितली तर त्यातून हाच मेसेज दिलाय , सर्व काही सद्गुरुच करतात ,सदगुरु चांगले तेच करतात आणि माझ्यासाठी जे चांगले आहे तेच सदगुरु घडवतात. हे एकदा विश्वासाने मनाला सांगितले जी सर्व समस्या सुटतात.
हे सर्व सद्गुरुकृपेने साम्यस्थळे समजली व लिहायला सुचले ,यांत काही न्यून असेल तर माझा दोष आहे व सदगुरु नक्कीच त्यावर मार्गदर्शन करतील.
जय साईराम