एकदा सम्राट चंद्र्गुप्तानी आपले प्रतिभाशील मंत्री चाणक्य यांना म्हटले की "किती चांगले झाले असते जर तुम्ही रूपवान पण असता"
त्यावर चाणक्यनी उत्तर दिले की "रूप व सौन्दर्य हे मृगजळासारखे आहे,माणसाची खरी ओळख त्याच्यातील गुण व बुद्धिने होते त्याच्या रुपाने नाही"
त्यावर चंद्रगुप्ताने विचारले की असे काही उदहारण आहे का ज्याच्या गुणासमोर रूप फिके पडेल??
त्यावर चाणक्यानी उत्तर दिले की "अशी खुप उदाहरणे आहेत महाराज पण त्याआधी आपण पाणी पिवून मन हलके करावे मग आपण यावर सविस्तर बोलूच"
एवढे बोलून त्यानी राजाला दोन पाण्याचे पेले भरुन राजाला पाणी प्यायला लावले
आणि मग राजाला विचारले "महाराज पहिल्या पेल्यातील पाणी हे सोन्याच्या घड्यातील होते व दुसरया पेल्यातील पाणी हे काळ्या मातीच्या घड्यातील होते आता मला सांगा की कोणत्या पेल्यातील पाणी थंड व चवदार होते ?"
राजाने उत्तर दिले की "काळ्या मातीच्या घड्यातील पाणी हे थंड व चविष्ट होते व त्याने मनाला तृप्ति मिळाली."
तेथे उपस्थित महाराणी हसत राजाला म्हणाल्या की "महाराज आपले प्रधानमंत्री खुपच हुशार आहेत आणि त्यानी आपल्या बुद्धिचातुर्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे
तो सुन्दर सोन्याचा घड़ा काय कामाचा ज्यातील पाणी बेचव आहे दुसरीकडे काळ्या मातीचा घड़ा दिसायला जरी बेढब व कुरूप असला तरी त्यात असे गुण दडले आहेत ज्यामुळे त्यातील पाणी थंड व चवदार बनले आहे व ते मनाला तृप्ती देते आहे
आता तुम्हीच सांगा महाराज रूप श्रेष्ठ की गुण व बुद्धि श्रेष्ठ ??"