Tuesday, June 20, 2017

दत्तलीलामृताब्दीसार

🌹🌺🕉🙏🏼🙏🏼🙏🏼🕉🌺🌹

*श्रीदत्तलीलामृताब्धिसार - सप्‍तमलहरी*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः* ॥

असी मदालसा नारी । प्रारब्धाचा भोग करी । पुनः झाले कालांतरीं । दोन सुत ॥१॥

त्यां सुबाहु शत्रुजित । ऐसीं नामें तात देत । मदालसाही हंसत । तीं ऐकूनी ॥२॥

त्यांला नित्य करी बोध । त्याही संसाराचा बाध । केला झाले ते विबुध । लोकीं जड ॥३॥

पाहोन ते तीन लेंक । राजा करी बहु दुःख । केले उपाय अनेक । सुधाराया ॥४॥

म्हणे पुत्र होती वेडे । ऐसें कर्म माझें कुडें । आतां पुढें वंश खंडे । रडे ऐसा ॥५॥

कुळीं ब्रह्मनिष्‍ठ लेंक । दैवयोगें होतां येक । सर्वां दे तो ब्रह्मलोक । हें तो नेणें ॥६॥

ओळखाया साधुपणा । स्वयें घ्यावा साधुबाणा । साधूच्या त्या गुप्‍त खुणा । भोंदू नेणें ॥७॥

उच्चीं पांच ग्रह येताम । प्रसवली पुनः सुता । म्हणे राजा नाम आतां । प्रिये तूं दे ॥८॥

माझ्या नामा तूं हंससी । तेव्हां साध्वी म्हणे त्यासी । तुम्ही ठेविल्या नामासी । बाधा पहा ॥९॥

क्रांति नाम गती राया । ती ह्या नसे म्हणोनियां । विक्रांत हें नाम वायां । झालें पहा ॥१०॥

मूळीं अमूर्त हा तेथ । सुबाहु हें नाम व्यर्थ । एकला तो शत्रुजित । होतो कसा ॥११॥

व्यवहारार्थ देह्याला । देणें तरीं तूं दे ह्याला । नाम अलर्क हें मला । आतां रुचे ॥१२॥

राजा ठेवी नाम तसें । एके दिनीं राजा पुसे । विक्रांता तूं वेड असें । कसें घेसी ॥१३॥

पढें विद्या राज्य करीं । नारी वरीं स्वयंवरीं । भोग भोगी यज्ञ करीं । तरीं धन्य ॥१४॥

विक्रांत तो बोलूं लागे । माता परा विद्या सांगे । निवृत्ति स्त्री वरीं अंगें । स्वात्मराज्यीं ॥१५॥

करायाचें तें मी केलें । मिळायाचें तें मिळालें । झालों तिघे बंधू भले । चौथा हो तो ॥१६॥

ऐसें वाक्यामृत त्याचें । भूपाळाला तें न रुचे । जेवी आचार साध्वीचे । कुलटेला ॥१७॥

कोपें बोले तो भार्येला । वंशनाश त्वां हा केला । उपदेश खोटा दिल्हा । त्याला मूढे ॥१८॥

खरा प्रवृत्तिमार्ग हा । देव पितृनरां दे हा । उपभोग तसा पहा । दुजा नोहे ॥१९॥

राज्य गजाश्‍व स्त्री धन । भोग शक्‍तीं देव दान । दे ज्या भगवंता त्याणें । तें भोगावें ॥२०॥

अन्यथा तो देवद्रोही । ही सामग्री ज्याला नाहीं । त्या दुर्भांग्यासाठीं पाहीं । निवृत्ती ती ॥२१॥

जरी निवृत्ती घे नर । त्यासी आमुचेंच द्वार । मग कां हें घरदार । सोडावें गे ॥२२॥

पुत्राविणें परलोक । न साधे हा श्रुतिलेख । ऐकें आतां चौथा लेंक । भ्रष्‍ट न हो ॥२३॥

हंसोनी ती बोले ऐका । बोधें आत्मलोक जिंका । काय कीजें रंका लेका । हे ही श्रुति ॥२४॥

न रुचे हा तुम्हां पंथा । तरी अलर्काला आतां । देतें वेदशास्त्रसंथा । कंथा न दें ॥२५॥

मग अलर्काला वेद । विद्या कला धनुर्वेद । सांगे शास्त्रा न्यायवाद । व्यवहार ॥२६॥

झाला अलर्क पंडित । स्वयंवरीं स्त्री वरित । तें पाहोनी पिता प्रीत । होता झाला ॥२७॥

राज्य देववुनी सुता । माता म्हणे शत्रू होतां । पेटी उघडीं ह्या हिता । तेव्हां पाहें ॥२८॥

ऐसें सांगोनी दे पेटी । राजा राणी वनीं जाती । तीणें बोधवूनी पती । उद्धरिला ॥२९॥

सायुज्यता घेती दोघे । करी पुत्र राज्य मागें । सहासष्‍ट हजारें घें । वर्षें भोग ॥३०॥

परिसंख्या मुख्य मानीं । रती मांस सुरापानी । झाला सक्त तो जाणोनी । सुबाहु ये ॥३१॥

तिघां माता पाजी बोध । आम्हा दुग्धसा तग्दध । ह्याला न लाधता छंद । ऐसें करी ॥३२॥

तरी आमुचा दायाद । आहे हाची याची याद । करुं पूर्वीं देवूं खेद । भेद नुरे ॥३३॥

ऐसा विचार करुनी । पुरा आला वनांतूनी । जडमूढता सोडूनी । बोले प्रौढ ॥३४॥

म्हणे अलर्का मी पूज्य । मला दे तूं आतां राज्य । येरु बोले सर्व त्याज्य । कां केलें त्वां ॥३५॥

आतां भीक देवूं काय । जरि होसी तूं क्षत्रिय । युद्धीं घेयी निजदाय । नायकें मी ॥३६॥

सुबाहू तें परिसोनी । काशीराजा कळवूनी । त्याचें साहाय्य घेवूनी । युद्धा आला ॥३७॥

लोक भेदानें फोडिले । किती दानें वळविले । किती सामें मेळविले । प्रधानादि ॥३८॥

योगसामर्थ्य अचाट । फोडविले किल्ले कोट । घाली कोशांची तो लूट । फूट होतां ॥३९॥

जे जे आपुले मानिले । ते ते सर्व उलटले । तें पाहुनी मन भ्यालें । अलर्काचें ॥४०॥

तेव्हां त्याचें धैर्य गळे । एकला तो वनीं पळे । मातृवाक्याला त्या वेळे । आठवी तो ॥४१॥

पाहे पेटी उघडून। त्यांत पत्रिका पाहून । वाची चित्तीं घाबरुन । अलर्क तो ॥४२॥

उलटती आपुलेची । तेव्हां संगती साधूची । करिं तेणें स्वहिताची । लब्धा होई ॥४३॥

ऐसा लेख तो पाहुनी । मनी निर्धार करुनी । दत्तापाशी तो येवोनी । बोले दीन ॥४४॥

जो सद्‌गुरो स्वामी मला । थोर दुःख झालें याला । दूर करा न या वेळा । दुजा त्राता ॥४५॥

हंसोनी श्रीदत्त बोले । दुःख तुला कोठें झालें । कोण तूं रे हें पाहिलें । बोलें प्राज्ञा ॥४६॥

असें वचन ऐकोनी । झाला विवेकी तत्क्षणीं । पाहें विचार करोनी । कोण मी हें ॥४७॥

म्हणे स्थूळ देह जड । ज्याला भूतांची सांगड । नाना विकारांची धाड । पडे येथें ॥४८॥

आत्मा सर्वगतपूर्ण । हा तो दिसे परिछिन्न । हा मी चिदात्मा याहून । वेगळाची ॥४९॥

बळें इंद्रियां चाळवी । झोपेमाजी जाडय दावी । तो मी प्राण होवूं केंवीं । मी ज्ञानात्मा ॥५०॥

क्षणें मन जायीं येयी । विभू मी हा राही ठायीं । त्याचा संशय न येयी । डोयीं माझ्या ॥५१॥

देहा व्यापी जागेपणीं । झोपेमध्यें जी लपोनी । जाते बुद्धी माझ्याहुनी । वेगळी ती ॥५२॥

जड जो हा अहंकार । त्रिगुणीं त्याहुनी पर । शुद्ध बुद्ध मी अमर । नर नोहे ॥५३॥

ऐसा माझा मी निर्धार । केला दुःखाचा विचार । करुं आतांची सादर । होवोनीयां ॥५४॥

नखापासोनि केशांत । ह्या देहाबाहेर आंत । शोधीतां न दुःखा यांत । दिसतसे ॥५५॥

प्राण भूक तान्हेवीणें । ऐसें दुःख कधीं नेणें । इंद्रियेंही भृत्यपणें । स्वार्था घेती ॥५६॥

रागद्वेषाचें तें मूळ । मन स्वभावें चंचळ । सुखदुःखाचा सांभाळ । हेंचि करी ॥५७॥

मन अन्नमय असे । विकारानें भ्रमतसे । परकी तें त्याचें कसें । दुःख मज ॥५८॥

गुरुजी म्यां चांचपलें । माझ्या रुपा ओळखिलें । हे हो दुःख मना झालें । बोलें साच ॥५९॥

हाच विचार दुर्धर । धुंडिती ज्या मुनीश्‍वर । तुम्ही दिल्हा हा सत्वर । सार प्रश्‍नें ॥६०॥

खातां मार्जारें उंदिरा । दुःख नोहे तेची कीरा । खातां हो हा दोष खरा । ममतेचा ॥६१॥

कोणी छीः थूः केल्या दुःख । हो आपणा रोग विख । वैर्‍या होतां हे घे सुख । ते अहंता ॥६२॥

ह्या दोहोंला कवटाळी । म्हणोनी घे मन भाळीं । सुखा दुःखा ह्यां ह्या वेळीं। जाळिले म्यां ॥६३॥

न घें अंगाच्या संबंधा । मग कैंचा राज्यधंदा । शत्रुमित्रत्वाचा भेदा । सांधा दिल्हा ॥६४॥

दत्त म्हणे धन्य तूं रे । क्षणें जाणियेलें सारें । आतां याचें स्थैर्य त्वां रे । बरें करीं ॥६५॥

करीं अर्धा सूक्ष्माहार । नीज रात्री दोनपार । मठीं एकांतीं विचार । कर हा रे ॥६६॥

तीनी भूमीच्या पूढती । रोकें पांच मनोवृत्ती । सत्कारें अभ्यासरीतीं । मती धरीं ॥६७॥

वशीकर वैराग्यें हो । संप्रज्ञात समाधि हो । सिद्धींला तूं वश्‍य न हो । मोहोनी रे ॥६८॥

अपमान सुधा मान । विषासमान रे मान । काळें मान खातां मा न । मान दे ती ॥६९॥

तिस्रेपारीं माधुकरी । तीन पांच सात घरीं । मागें खातां दूर करीं । बरी रुची ॥७०॥

हाचि तुला उपदेश । निर्विकल्प समाधीस । येणें जासी तूझा खास । वास ब्रह्मीं ॥७१॥

सोन्यावरी मल येतां । त्या अग्नीची आंच देतां । जैसी येयी प्राग्रूपता । तैसें येथें ॥७२॥

जीव ब्रह्मची असोन । अविद्यांशें हो मलिन । योगें विशुद्ध होवून । होतो प्राग्वत् ॥७३॥

पिंडीं ब्रह्मांडीं जे गूढ । तें मी मी तें हेची दृढ । होई तावत्करीं वाढ । हा अभ्यास ॥७४॥

ऐसें सांगोनी धाडीला । पुरा त्या तो स्वबंधूला । प्रेमें येवोनी बोलिला । घे तूं राज्य ॥७५॥

बंधू म्हणे तूं रे आर्य । गळलें कीं तुझें वीर्य । तूं क्षत्रिय धरीं शौर्य । कार्य साधीं ॥७६॥

येरु बोले त्वां तारिलें । दत्तें स्वात्मराज्य दिल्हें । आतां कांहीं न मी बोले । धालें मन ॥७७॥

मग सुबाहू आलिंगी । म्हणे झालों समभागी । मातेची ही कृपा जगीं । हो जी मान्य ॥७८॥

काशिराजा कार्य भलें । झालें मीही वनीं चालें । काशीराजा त्याला बोले । झाले काय ॥७९॥

बंधू तुला न दे भाग । म्हणोनी त्वां केला संग । आतां दोघेही निःसंग । कां होतां हो ॥८०॥

म्हणे सुबाहू हा स्वार्थ । सांडी त्या दाविला पंथा । हेंची कार्य झालें आतां । स्वस्थता ये ॥८१॥

काशीराजा म्हणे धन्य । बंधू उद्धरिला मान्य । झालों मी कीं बोले अन्य । संन्यस्त तूं ॥८२॥

स्वपर न साधूजना । दयेनें तारिती दीनां । सम विषय न त्यांना । जनांमाजीं ॥८३॥

आजी मजवरी कृपा । करीं बंधूपरी बापा । येरु म्हणे अनुतापा । न पावसी ॥८४॥

जरीं अलर्क विषयीं । अनुतापें दत्तपायीं । पडे राज्या लात देयी । घेयी मुक्‍ति ॥८५॥

भक्‍ति वैराग्यावांचोनी । प्रवोध न भरे कानी । हें तूं समजूनी मनीं । वनीं जायीं ॥८६॥

सांडीं राज्य पत्ती हत्ती । घेयीं साधनसंपत्ती । एकांतीं तूं निजचित्तीं । वृत्ती लक्षीं ॥८७॥

लक्षीं उठे जी जी वृत्ती । साक्षीपणें मुरवी ती । तो मी साक्षी ऐसी मती । अंतीं ठरे ॥८८॥

ठरें निरुपाधी बुद्धीं । दृश्यानुविद्ध समाधि । निर्विकल्प तो समाधी । दृढत्वें हो ॥८९॥

आंत तसेच बाहेर । समाधी निरहंकार । येणें आत्मसाक्षात्कार । शीघ्र लाभे ॥९०॥

ऐसें होतां मन जेथ । जासी समाधी ही तेथ । संदेह न धरीं येथ । सत्य मानीं ॥९१॥

ऐसें सुबाहू सांगोनी । पुसोनी त्यां चाले वनीं । काशीराजा तें ऐंकोनी । पुरा आला ॥९२॥

पुत्रा राज्य दे ये वनीं । तसा अभ्यास करोनी । तोही पावला निर्वांणीं । साधुसंगें ॥९३॥

पुत्रा राज्यीं बैसवूनी । अलर्कही आला वनीं । योगाभ्यासा आचरोनी । स्थिरावला ॥९४॥

तत्त्वज्ञानें मनस्थैर्य । वासनेला तो निर्वीर्य । करी राहे योगिवर्य । तुर्यपदीं ॥९५॥

तेव्हां स्मरे पूर्ववृत्ता । प्रौढ जैसा बाल्यावस्था । म्हणे कैसी ये मूर्खता । चित्ता तेव्हां ॥९६॥

विचार हा होतां नीट । आतां वाटे तीचा वीट । माया घालोनी हें कूट । लूटतसे ॥९७॥

पृथ्वींतील धन धान्य । नारी वस्त्र गो भूषण । एकालाही न हो पूर्ण । तृष्णायोगें ॥९८॥

तृष्णा मरतां ये तोष । जेथें तेथें होतो हर्ष । लपें गडयांसह रोष । हें म्यां देखे ॥९९॥

ऐसें बोलोनी शरीर । योगाग्नीनें जाळी वीर । दत्तरुपीं मिळे धीर । समरसें ॥१००॥

*इति श्रीदत्तलीलामृताब्धिसारे अलर्कगत्याख्या सप्‍तमलहरी समाप्‍ता ॥ओव्या॥७००॥*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*संकल्प :-( अनंत देववाई।)*
☘☘☘🍀🍀🍀☘☘☘

Saturday, June 17, 2017

काका महाराज साई मंदिर

ही सदस्यांनी प.पू.श्रीकाका महाराजांची भेट होण्याविषयी, त्यांचे दर्शन घेण्याविषयी विचारणा केली आहे, त्या निमित्त :-
प.पू.श्रीकाका महाराज पुण्यात राहतात आणि फारसे पुण्याबाहेर जात नाहीत. त्यांच्या श्रीसांईमंदिरात दर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता सत्संग असतो व दर शनिवारी संध्याकाळी ६:३० वाजता भजन असते, या दोन्ही दिवशी श्रीकाका महाराजांचे दर्शन होऊ शकते, त्यांना भेटता येऊ शकेल. त्यांचा सत्संग पुण्यातील त्यांच्या श्रीसांईमंदिरातच असतो, तिथल्या सत्संगात ते स्वतः बोलतात. या शिवाय सत्संगात येणा-या साधकांनाही आपले विचार मांडायला सांगतात.
त्यांचे काही अनुयायी पुण्याबाहेर नागपूर, नांदेड, चिपळूण तसेच परदेशात त्यांच्या प्रवचनांच्या CDs च्या माध्यमातून सत्संगाचा उपक्रम राबवतात. नागपूर येथे गेली काही वर्षे सत्संग सुरु आहे. तिथे त्यांचा अनुयायी परिवार मोठा आहे. तिथल्या परिवाराला भेटण्यासाठी वर्षातून एकदा ते नागपूरला जातात.. तिथे एक दिवस सत्संगाचे आयोजन केले जाते.
श्रीसांईमंदिरात दर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता सत्संग असतो
अनुभूति चे जे सदस्य पुण्यात राहतात त्यांनी आवर्जून श्रीसांईमंदिरातील सत्संगाला यावे, त्यांना श्रीकाका महाराजांचे प्रवचन ऐकता येईल. श्रीकाका महाराजांच्या CD, DVD सुध्दा उपलब्ध आहेत. पुण्याबाहेरील जे सदस्य आहेत त्यांचे कोणी परीचित पुण्यात असतील तर त्यांच्या मार्फत CD, DVD मागवून त्याचा लाभ आपण घेऊ शकता.
मंदिराचा पत्ता :-
११, शिवकृपा, नंदादीप सोसा., आनंदनगर,
सिंहगड रस्ता, जगताप हाॅस्पिटल समोर,
जनसेवा बॅक जवळ, पुणे ५१.
मंदिराची वेळ :-
सकाळी 8 ते 12
संध्याकाळी 6 ते 9

Friday, June 16, 2017

दिव्यानुभव 7

अशक्यही शक्य करतील स्वामी

मागील आठवड्यात घडलेली घटना आहे ज्याने खरंच नतमस्तक झालो आणि स्वामींचे मनापासून आभार मानले ,
16 मे ला मुलाची मुंज झाली व त्यानंतर थोडा झालेला पसारा आवरायला थोडा वेळ लागतोच , त्यातच रुटीन मध्ये व्यस्त झाल्याने आवराआवर मंद गतीने चालू होती. त्यात आम्हा तिघांनाही आजारपण , ताप त्यात आठवडा गेला, या सर्वात काही बेसिक गोष्टी मुलाच्या हाताला लागतील अश्या राहून गेल्या.

आता मुल म्हटले की कुतुहूल आलेच आणि त्याने स्टेपलर ओपेरेशन बघून शिकून घेतले होते ,त्यादिवशी मी संध्याकाळी कामावरून घरी आलो व हातपाय धुवून टीव्ही व फेसबुक पोस्ट दोन्ही गोष्टी एकावेळीच चालू होत्या त्यात माझी औषधे आणायला बायको बाहेर गेली ,मुलगा बेडरूम मध्ये खेळतोय एवढेच डोक्यात त्यामुळे मी हॉलमध्ये टीव्ही मोबाईल मध्ये गुंग ,
बायको बाहेरून आली दार वाजल्यावर  मुलगा बेडरूम मधून धावत हॉलमध्ये आला व टीव्ही बघत बसला , थोड्या वेळाने मी सहज बेडरूम मध्ये गेलो तर ट्युबलाईट का बंद असे बघितले तर वायर तुटलेली आढळली .
मी आधी ट्युबचे बटण बंद केले ,दुसरा ब्लब चालू केला व मुलाला बोलावून घेतले आणि ती वायर कोणी कापली विचारले तर म्हणाला मीच कापली , मला एकदम शहारा आला, चालू असलेल्या ट्युबलाईटची वायर कापली म्हणजे शॉक लागण्याचा कित्ती धोका होता? तरीही मी बायकोला विचारून किचन मधली कात्री ,सुऱ्या आहेत का विचारले तर सर्व व्यवस्थित होते , मग मुलाला गोड बोलून विचारले की वायर कशाने कापली तर आधी घाबरून काहीच बोलला नाही आणि मग हळूच स्टेपलर माझ्या हातात दिला , स्टेपलरने वायर कापणे कसे शक्य आहे? तरीही मी वायर नीट बघितले तर त्यावर 3 स्टेपल पिन आढळल्या ,म्हणजे त्याने सांगितलेले खरेच होते, खूपच धोकादायक होते हे सर्व कारण जिवंत वायर मेटलच्या स्टेपलरने कापायला किती ताकत लावायला लागेल आणि वायर कापुनही माझा मुलगा एकदम सुरक्षित ,
देवाचे आभार मानले ,मुलाला सर्व समजावले की लाईट चालू असताना त्याला हात लावायचा नाही व बायकोला सांगून आधी सर्व टूल्स व स्टेपलर सारखे स्टेशनरी साहित्य कपाटात ठेवले .
स्वामींचे आभार मानले कारण स्टेपलर ने प्रेस करून वायर कट् व्हायला खरच खूप वेळ लागेल त्यात जिवंत वायर म्हणजे शॉकचा धोका असूनही माझा मुलगा सहीसलामत.

आधी वायर जॉईंट करून त्याला मुलाच्या हाताला येणार नाही अशी वरच्या बाजूला चिटकवली आणि मग मुलाला नीट समजावून सांगितले की शॉक कसा लागू शकतो व काय होईल ते सांगितले (मला सातवीत असताना जबराट शॉक लागलेला की मी वायरला चिकटून होतो व लटकत होतो ,बाबांनी 5 सेकंद उशिरा मेन स्विच बंद असता केला तर तेव्हाच स्वारी म्हणजे मी परलोकात पोचलो असतो)
दुसऱ्या दिवशी पहाटे मला स्वप्नात एक मुंडासे बांधलेले आजोबा होते (स्वामीच ते अजून कोण?) व मला म्हणाले एक गंडांतर टळले (माझा वर्षभरपूर्वीचा अक्सिंडेन्ट)दुसरे अरिष्टही टळले,घाबरू नकोस रे, त्यानंतर मागच्या बाजूला एक आवाज आला त्या दिशेने बघून पुन्हा समोर बघितले तर त्या माळरानावर फक्त मी होतो बाकी कोणीच नाही , जाग आल्यावर मनोमन स्वामींना नमस्कार केला व कामावर गेलो, संध्याकाळी आल्यावर सहकुटुंब स्वामींच्या मठात जाऊन नमस्कार केला व स्वामींचे आभार मानले.

स्वामींची प्रचिती येतेच की ते सतत आपल्याबरोबर असून आपले संरक्षण करत असतातच आणि त्यांचे वचन 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' सार्थ करत असतातच,

अनंतकोटी राजाधिराज योगीराज अक्कलकोटनिवासी परमकृपाळू सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
--निलेश जोशी

Sunday, June 4, 2017

कण्हेरी बारामती स्थान महात्म्य

एक एक स्थान महात्म्य आपल्याला माहीत नसते ,पण त्याची प्रचिती आल्यावर आपण त्याला शरण जातो,

2 वर्षांपूर्वी मला सतत 6 आठवडे ताप , त्यामुळे नॉशिया आणि वजन घटणे असा तिहेरी त्रास चालू झाला , सर्व टेस्ट झाल्या ,डॉक्टर उपाय ,गोळ्या बदलणे अगदी टायफाईड म्हणून ऍडमिट होऊन 7 दिवस इंजेक्शन कोर्स पण केला ,पण नक्की निदान होतच नव्हते,ताप काही कमी होत नव्हता ,
शेवटी आमच्या कंपनीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुण्यातील रुबी हॉल येथे ऍडमिट झालो , तेथील डॉ मोदी देवमाणूसच ,त्याने माझ्या सर्व टेस्ट लिहून दिल्या व 4 दिवस सलग सर्व टेस्ट चालू होत्या ,ब्लड,युरिन ,स्टोल ,सोनोग्राफी , एड्स टेस्ट अश्या जवळजवळ 100+ टेस्ट झाल्या पण सर्व रिपोर्ट निगेटिव्ह व ताप कशाने येतो हे गूढच होते,
डॉ मोदी पण संभ्रमित झाले की 4 दिवस वेगवेगळ्या टेस्ट करूनही निदान काहीच नाही व ताप तर सुरूच आहे (दिवसातून 2 वेळाच ताप यायचा व ओसरायचा) मग त्यांनी त्या ताप आलेल्या वेळेत ब्लड सॅम्पल घेतले पण त्याचेही रिपोर्ट नॉर्मल,
बायको ,सासुआई ,भाऊ,आत्या,बहिणी सर्व काळजीत की काय झालंय नक्की?
त्याच दिवशी बायकोची बहीण ,आपली ग्रुप सदस्य Madhavi Hadap-Tagade हॉस्पिटलला आली व त्यांनी सांगितले की बारामतीजवळ एक मारुती ठिकाण आहे ,जागृत आहे व सर्व नवस बोलतात त्या ठिकाणी तुम्ही नवस बोला की सर्व निदान होऊन उपचार होऊन बरे वाटले की सपत्नीक दर्शनाला येऊ ,त्याच्या मुलाच्या आजारपणावेळी असेच निदान होत नव्हते व त्यांना गुण आलेला.
हा आशेचा किरण होता आम्हाला, आम्हीही लगेच हात जोडून नवस बोललो व दर्शनाला येणार असे सांगितले.
लगेच दुसऱ्या दिवशी डॉ मोदी राऊंडला आले व त्यांनी पोटाची सोनोग्राफी व फुल्ल बॉडी सिटी स्कॅन करायला सांगितले व स्कॅन मध्ये त्यांना निदान झाले की फुफ्फुसात गाठ आहे व त्यामुळे ताप येतो , ती गाठ कदाचित कॅन्सरची असेल म्हणून पुन्हा स्कोपी करुन सॅम्पल पाठवले टेस्ट करायला 2 दिवसानी ती टेस्ट निगेटिव्ह आली मग बोन मेरो सॅम्पल पण टेस्ट केले ,अंती निदान झाले व  त्यानंतर औषधोपचाराने बरे वाटले ,अजूनही त्यावर गोळ्या उपचार चालू आहेत ,पण ताप येणे कमी आहे.2 वर्षे अपघातामुळे व त्यावरील ट्रीटमेंट , सुट्टी नाही अश्या सबाबीमुळे कण्हेरी दर्शन राहिलेचग पण मागच्या आठवड्यात गोंदवले वरून श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतीरायचे दर्शन घेतले ,नवस पूर्ण केला व अशीच कृपा ठेव अशी प्रार्थना केली .
स्थान महात्म्य सांगायचा उदिष्ट एवढेच की सर्वाना देवस्थानाची महती कळते व अडचणीच्या वेळी याचा फायदा सर्वाना होईल.