Tuesday, September 27, 2016

सूर्योदय

हृदयात भावनांचा कल्ला असेल तेव्हा
शांत नीरव क्षणांनी ते गजबजेल तेव्हा

झाल्या असती जखमा शरीरतनूस तेव्हा
मन ठेवले ताजे त्या परिस्थितीतही तेव्हा

प्राक्तन म्हणावे की परीक्षा देवाने घेतलेली
त्यातही व्हावे उत्तीर्ण हेच ठरवले तेव्हा

संपेल हे वलय अन होईन रिसेट मी पुन्हा
जगण्यास देईल बळ हाच आशावाद तेव्हा

बाजूला सारून टाकू हे पूर्वग्रहण जरासे
आयुष्यात सूर्योदय नक्की दिसेल तेव्हा

----निलेश जोशी