हृदयात भावनांचा कल्ला असेल तेव्हा
शांत नीरव क्षणांनी ते गजबजेल तेव्हा
झाल्या असती जखमा शरीरतनूस तेव्हा
मन ठेवले ताजे त्या परिस्थितीतही तेव्हा
प्राक्तन म्हणावे की परीक्षा देवाने घेतलेली
त्यातही व्हावे उत्तीर्ण हेच ठरवले तेव्हा
संपेल हे वलय अन होईन रिसेट मी पुन्हा
जगण्यास देईल बळ हाच आशावाद तेव्हा
बाजूला सारून टाकू हे पूर्वग्रहण जरासे
आयुष्यात सूर्योदय नक्की दिसेल तेव्हा
----निलेश जोशी