आजकाल कोकणात गावागावात कॅन्सरने गेलेले लोक वाढत आहेत ,त्या व्यसनमुक्ती साठी आपण एकत्र येऊन काहीतरी केले पाहिजे. याच विषयावर विनोदी ढंगाची आज सुचलेली एक मालवणी कविता
3 दिवस झाले,
इट इलो बाबा,
टीव्हीर येता ,
लुंगीवालो खावबा,
निसते कटकटी मेल्यांचे,
घरार टाकतत धाडी
आयकर, इडीवाले,
मारतत गडग्यावरसून उडी
ह्या इडी ईडी आयकान,
कान ह्यो इटाम्बलो,
मेल्यानु तुमका काय ,
दुसरो शब्द नाय गावलो?
एक वरीस झाला ,
ट्रीटमेंट चालू करून
धाप लागता चलताना,
भातो येता भरून
डाकटर म्हणता,कुड्याची
ईडी दि सोडून
त्याका त्वांड लायलय,
तर घेईन तुका बघून
वाडयेतले पोर टॉर,
सगळ्यांका म्हायत आसा,
माझ्यापुढे इडयेचा,
नावपण नाय घेवचा
गावातले लोक हेतूर,
कर्तत माका मदत
चुकान इडयेचो इलोच इशय,
सोमतो बदलतत
टीव्ही वयला मायझयांका,
ह्या कोण सांगतलो
3 दिसापासून मेले ईडी ईडी,
ह्याच बोबंलतले
आता ईडी शब्द इलो तरी,
कायच वाटना नाय
गावातले गेलले कॅन्सरने,
चेहरो इसराक जाणा नाय
इतके पावसाळे बघून ,
सल्लो माझो तुमकाव
दोन पावटाची मजा,म्हणांन
ईडी ,तंबाखू नको खावं
ईडी ईडी टीव्हीर,
केवढाय त्यांका बोंबलू दे,
गावातल्या ह्या व्यसनांका,
येशीच्या भायर जावन दे
वायच मज्जा म्हणांन चालू झालला ,
व्यसन मरे झाला,
जास्त नाय रे म्हणता म्हणता, आंगवळणी पडला
तू मी सगळे जणा ह्येच्यापुढे,
आता याक मातर करूया ,
कोनय लागलोच नादाक तर, त्येच्यापासून दूर त्येका करूया
ईडी तंबाखू घे रे तुपण,
लोकांका वरडू दे कितक्याव,
आमच्या गावात व्यसनांचो,
आता नाय होवचो शिरकाव
मालवणी आम्ही पक्के,
शब्द नाय बदलुचो
ह्येचापूढे कोणच,
ह्या व्यसनात नाय अडकूचो
-- निलेश जोशी