Friday, August 23, 2019

व्यसन मुक्ती

आजकाल कोकणात गावागावात कॅन्सरने गेलेले लोक वाढत आहेत ,त्या व्यसनमुक्ती साठी आपण एकत्र येऊन काहीतरी केले पाहिजे. याच विषयावर विनोदी ढंगाची आज सुचलेली एक मालवणी कविता

3 दिवस झाले,
इट इलो बाबा,
टीव्हीर येता ,
लुंगीवालो खावबा,

निसते कटकटी मेल्यांचे,
घरार टाकतत धाडी
आयकर, इडीवाले,
मारतत गडग्यावरसून उडी

ह्या इडी ईडी आयकान,
कान ह्यो इटाम्बलो,
मेल्यानु तुमका काय ,
दुसरो शब्द नाय गावलो?

एक वरीस झाला ,
ट्रीटमेंट चालू करून
धाप लागता चलताना,
भातो येता भरून

डाकटर म्हणता,कुड्याची
ईडी दि सोडून
त्याका त्वांड लायलय,
तर घेईन तुका बघून

वाडयेतले पोर टॉर,
सगळ्यांका म्हायत आसा,
माझ्यापुढे इडयेचा,
नावपण नाय घेवचा

गावातले लोक हेतूर,
कर्तत माका मदत
चुकान इडयेचो इलोच इशय,
सोमतो बदलतत

टीव्ही वयला मायझयांका,
ह्या कोण सांगतलो
3 दिसापासून मेले ईडी ईडी,
ह्याच बोबंलतले

आता ईडी शब्द इलो तरी,
कायच वाटना नाय
गावातले गेलले कॅन्सरने,
चेहरो इसराक जाणा नाय

इतके पावसाळे बघून ,
सल्लो माझो तुमकाव
दोन पावटाची मजा,म्हणांन
ईडी ,तंबाखू नको खावं

ईडी ईडी टीव्हीर,
केवढाय त्यांका बोंबलू दे,
गावातल्या ह्या व्यसनांका,
येशीच्या भायर जावन दे

वायच मज्जा म्हणांन चालू झालला ,
व्यसन मरे झाला,
जास्त नाय रे म्हणता म्हणता, आंगवळणी पडला

तू मी सगळे जणा ह्येच्यापुढे,
आता याक मातर करूया ,
कोनय लागलोच नादाक तर, त्येच्यापासून दूर त्येका करूया

ईडी तंबाखू घे रे तुपण,
लोकांका वरडू दे  कितक्याव,
आमच्या गावात व्यसनांचो,
आता नाय होवचो शिरकाव

मालवणी आम्ही पक्के,
शब्द नाय बदलुचो
ह्येचापूढे कोणच,
ह्या व्यसनात नाय अडकूचो
-- निलेश जोशी

Saturday, August 3, 2019

सदगुरु अनुभूती #दिव्यानुभव

सद्गुरू श्रीकाकामहाराज की जय

सद्गुरू यांचे सूक्ष्मातून काम चालूच असते आणि बरेच दुवे आपोआप जुळवतात व आपण मात्र त्यात निमित्तमात्र असतो ,अर्थात आपला समावेश हिसुद्धा सद्गुरूंची योजनाच असते, याचाच आलेली अनुभूती
मी पूर्ण घटनाक्रम सांगून मग त्यातील सद्गुरू योजना कशी असते हे नंतर सांगतो ,तर झाले असे,
मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे आम्ही कोकणात गावी जाऊन आलो आणि त्याचवेळी माझा चिंचवडमधील मित्र संदीप पाटील सपत्नीक घरी आला. आम्हीसुद्धा त्याला घरी आल्यावर चहापाणी झाले , गावचाआंबा कापून दिला व घरी जाताना आंबे त्यांना दिले. विशेष म्हणजे आम्ही 4 वर्षांनी भेटत होतो कारण तो मित्र चीनमध्ये कंपनीच्या कामासाठी होता व मागील 4 महिने चिंचवडमध्ये आला पण आजच त्याला मला भेटण्याची इच्छा झाली व मीही त्याला म्हणालो आताच गावाहून आलो म्हणून भेटलो नाहीतर भेट शक्यच नव्हती. थोडक्यात त्या मित्राची 4 वर्षानी झालेली भेट हा पहिला दुवा.

त्यांनतर 5 दिवस मी कामावर गेलो , शनिवारी मला सुट्टी होती म्हणून घरीच होतो आणि त्यावेळी सकाळी कविताने (बायको) मला उठवले व तिच्या मामीच्या भावाचा मृत्यु कोल्हापूरला झाला ही बातमी सांगितली.
तिच्या मामीचा भाऊ व वैनी कोल्हापूर दर्शनाला गेलेले व रात्रीच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला व मामी कोल्हापूरला निघाली होती.
तिलाही 10 मिनिटपूर्वी तिच्या मामीने फोन करून सांगितले. चहा घेताना गप्पा मारताना त्या मृत व्यक्तीने किती मामाच्या मयताच्या वेळी त्रास दिला वैगरे जुन्या आठवणी बोलताना कविता अचानक म्हणाली की मामी तिकडे एकटी आहे तर कोणाची ओळख आहे का म्हणजे हॉस्पिटल व पोस्ट मार्टम प्रक्रियेत एखाद्याची मदत करता येईल का असे विचारले.
मी सुद्धा विचार केला आणि आठवले माझा मित्र संदीप पाटील यांची सासुरवाडी कोल्हापूर ,लगेच त्याला फोन केला व त्यानेही सांगितले ओळकीचे खुपजण आहेत तू डिटेल्स कळव.
मी लगेच कवितांच्या मामीशी बोललो व डिटेल्स घेऊन लगेच संदीपला कळवले.
संदीपने त्याच्या कोल्हापूरमधील मेव्हण्याला फोन करून CPR हॉस्पिटलला पाठवले. त्या मेव्हण्याने ओळख वापरून प्रक्रिया चालू केली व सर्वाना नाश्ता, चहा घ्यायला लावला ,20 मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून डेथ सर्टिफिकेट मिळवून दिले व शव पुण्याला आणण्यासाठी व्हॅन करून दिली.मामी व मयत व्यक्तीची पत्नी पुण्यात आल्या व संध्याकाळी 4 वाजता सर्व संस्कार पूर्णही झाले.
आता यातले दुवे सांगतो ,
1. 4 वर्षांनी भेटलेला मित्र नेमका एक आठवडा आधीच भेटतो (4 महिने एकाच गावात राहूनही भेट नाही पण नेमकी त्याच दिवशी त्याला मला भेटायची इच्छा होते)
2.कविताला मृत्यूची बातमी सांगितल्यावर त्या व्यक्तीला मदत मिळायला हवी असे खूप आतून वाटणे
3.कविताने त्यांना मदत करायला कोणी कोल्हापूरला मित्र आहे का हे विचारणे
4.नेमका माझा मित्राची आठवण होणे व त्यांनतर त्यांच्याकडूनही लगेच सूत्रे हलवणे.
5.मित्राचा मेव्हणा कोल्हापूरला जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करतो काय आणि सरकारी हॉस्पिटलमधील 6-7 तासाची प्रक्रिया 20 मिनिटात पूर्ण करतो काय
6.मृत्यमुळे तणावात असलेल्या मामी व त्यांची वहिनी वेळेत शव घेऊन येतात काय आणि सर्व देहसंस्कार वेळेत होतात.

म्हणजेच त्या बाहेरगावी व्यक्तीला मदत मिळावी ही सद्गुरूंची योजना आणि त्यासाठी सद्गुरुनी निमित्तमात्र म्हणून केलेली आम्हा सर्वांची योजना .
सद्गुरुचे कार्य अश्या प्रकारे चालते हेही अनुभवता आले. सद्गुरुकार्य सदोदित चालूच राहते ,त्या कार्यात आपलाही योजना होण्यासाठी सतत जास्तीत जास्त नामस्मरण करत राहणे हेच आपल्या हातात.

जय साईराम