अकबर ने बीरबलला अचानक 3 प्रश्न विचारले
〰〰〰〰〰〰〰
प्रश्न होते
1)'ईश्वर कुठे राहतो?
2)ईश्वर कसा मिळतो
आणि
3) तो काय करतो?''
बीरबल हे अचानक प्रश्न ऐकून गड़बडून गेला व म्हणाला ''जहाँपनाह! या प्रश्नांची उत्तरे उद्या देतो"
बीरबल घरी पोचला तेव्हा खुप उदास होता.ती उदासी बघुन जेव्हा मुलाने विचारले तेव्हा बिरबल म्हणाला
''बेटा आज अकबर बादशाहने मला एकावेळी तीन
प्रश्न विचारले आहेत
1)'ईश्वर कुठे राहतो?
2)ईश्वर कसा मिळतो
आणि
3) तो काय करतो?''
याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या याची उत्तरे द्यायची आहेत.
बीरबलच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून जा व महाराजांना मी याची उत्तरे देईन
पुत्रहट्ट बघुन बिरबल दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला
बीरबलला पाहून बादशाह अकबर ने म्हटले- ''बीरबल काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे
बीरबल म्हणाला
''जहाँपनाह आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल
अकबर ने बीरबलच्या मुलाला पहीला प्रश्न विचारला ''सांग"
'ईश्वर कुठे राहतो ?
बीरबलने विनंती केली महाराज एक पेला दूध साखर घालून आणावे आणल्यावर विचारले महाराज दूध कसे आहे?
अकबर ने दूध चाखले व म्हणाला गोड आहे
परन्तु बादशाह यात साखर दिसते का ?
बादशाह म्हणाले साखर नाही कारण ती दुधात विरघळून गेले आहे
बरोब्बर, जहाँपनाह!
ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे असून दिसत नाही
बादशाह आनंदीत होवून म्हणाला मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला
''जहाँपनाह थोडे दही मागवाल का?
'' बादशाह ने दही मागवले मग बिरबल पुत्र म्हणाला
''जहाँपनाह! यात लोणी दिसते का?
बादशाह म्हणाला लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल
बिरबलपुत्र म्हणाला महाराज तसेच देव दर्शन साठी मंथन साधना तपत्चर्या करायलाच लागेल
बादशाह खुश झाला व म्हणाला आता अंतिम प्रश्न ईश्वर करतो काय?
बीरबलपुत्र म्हणाला - ''महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल''
अकबर बोललाे- ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य।''
पुत्र म्हणाला - ''जहाँपनाह गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य
खाली बसतो
'' अकबरने सिंहासन ख़ाली केले व स्वतः खाली बसला
बिरबलपुत्र स्वतः सिंहसनावर् बसला व म्हणाला हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे.
अकबर म्हणाला म्हणजे काय? मी समजलो नाही .
बालक म्हणाला- ''जहाँपनाह!
ईश्वर हेच तर करतो किंवा करण्याची क्षमता राखतो , क्षणात राजाला रंक व भिकरयाला राजा बनवू शकतो.