सदगुरु श्री काकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य)हे नेहमी सत्संगातून उपदेश सोप्या उदाहरणातून सांगत असतात.नामसाधना करताना अनेकदा मनाला मागायची सवय लागते ,जसे त्या जीवाला समजत नाही की माझ्यासाठी काय योग्य आहे? तरीही मागायची सवय काही संपत नाही. सदगुरु सदोदित म्हणतात की नामसाधना करताना त्यातून काय मिळेल ही अपेक्षा न करता सद्गुरुंच्या अनुसंधानात राहायचे आहे. सदगुरु जे माझ्यासाठी चांगले आहे ते सर्व देणारच आहेत त्यामुळे निश्चिंत मनाने सदगुरुपायी वाहून घ्यायचे आहे. अनेकदा आपण आपल्या मनासारखे झाले नाही तर खट्टू होतो पण तेव्हाही सद्गुरुनी माझ्यासाठी चांगले तेच घडवून आणले हा विश्वास हवा.लहान मुलाला जसे अनेकदा काय खायचे कळत नाही पण त्याची आई जे पचणार आहे असा गुरगुट्या भात भरवते तसेच सदगुरु आपल्यासाठी जर चांगले असेल ते आपल्या आयुष्यात घडवून आणतात.
मी कोण आहे यापेक्षा मी कोणाचा आहे याची जाणीव ठेवून माझ्या सद्गुरूंना कमीपणा येईल असे मी वागणार नाही असं मनाशी पक्के ठरवायला हवे
जय साईराम
No comments:
Post a Comment