आज टीवी वर गाणे ऐकले आणि प्रवास विषयावर लिहायला चालना मिळाली.
"रोते हुए आते है सब
हसता हुवा जो जायेगा
वोह मुकद्दर का सिकंदर
जानेमन कहलायेगा "
एडमिन ने आजचा विषय दिला प्रवास आणि वरील ओळीत जीवन प्रवास समर्पकरित्या मांडलाय कवी अजांन यांनी.जगात आल्यावर सर्वजण रडतच येतो पण जाताना हसत जावे व मधील संपूर्ण जीवनप्रवास कसा करावा हे आपल्या हातात असते.
मंगेश पाडगावकरांचे पण अशाच अर्थाचे गाणे आहे
"रडतच आलो येताना पण
हासत जावे जाताना"
हा जीवन प्रवास चालू करतोच आपण आपल्या आईबरोबर , आईशी जोडलेली नाळ म्हणजे दुवा आपल्याला या जगात आणणारा. मग हळू हळू जगाचे नियम चालीरीति आपण शिकत जातो.
पहिला गुरु आई व आपले कुटुंबिय व जसजसे आपण मोठे होत जातो या जीवन प्रवासात आपल्याला सह प्रवासी भेटत जातात, काही अनुभव शिकवून जातात धड़े देवून जातात तर काही आपल्याला आपल्या चुकाही दाखवतात.
बऱ्याच वेळेला आपल्याला वाटते प्रवासातील वाहने साधने सहप्रवासी हे योग्य निवडलेत आपण , पण कालांतराने ते अयोग्य होते हेही कळुन चूकते ,
जीवन प्रवास हा असाच असतो
चुकातून शिकवणारा व चुकत चुकत बरोबर होत जाणारा
हे सर्व अनुभव देणारे आपले कुटुंबीय , मित्र ,जीवलग ,सखे सोबती व आपले विरोधकही
या जीवन प्रवासात विविध अनुभव देवून समृद्ध करणाऱ्या सर्वाना हा लेख मनापासून अर्पण.
---निलेश जोशी