आपले सदगुरु श्री काकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य) सत्संगातून मार्गदर्शन करताना अनेक दाखले देतात.संतांचं मन कधीच का खचत नाही यावर मार्गदर्शन करताना श्रीसद्गुरू अनेक मार्मिक उदाहरणातून समजवतात. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले ते सद्गुरूंनी,नारदमुनींनी दिलेल्या नामामुळे व वाल्या कोळीनें त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे.
संत जनाबाईना एवढा विश्वास होता की प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांच्या मदतीला यायला लागले.
संत गोरा कुंभार विहित कर्म करताना पांडुरंगचरणी एवढे तल्लीन झाले आणि स्वतःचे बाळ तुडवले गेले हेही समजले नाही ,शेवटी त्यांची दृढ भक्ती बघून पांडुरंगाला बाळाला जिवंत करावे लागले.
संत मीराबाईंनी तिचे सर्व सर्वस्व श्रीकृष्णचरणी अर्पिले की त्यांचे स्वतःचे अस्तित्वच उरलेले नाहीये असा त्यांचा भाव झाला.त्यांना दिलेले विष हसत हसत मीरेने पिऊन टाकले की ते श्रीकृष्णाने दिलेले आहे व ते तारकच असणार हे भाव जागृत ठेवला होता.मीरेच्या अंतरंगातील भक्ती व श्रीसद्गुरुंवरील दृढ श्रद्धा एवढी प्रबळ होती की ते विष पचवण्याची ताकद तिला आली.
आपणही आपली प्रत्येक कृती व अवस्था श्रीसद्गुरुचरणी अर्पण करायला शिकले पाहिजे.आनंद झाला तो सद्गुरूंना अर्पण, आजार आला तर तोही सद्गुरूंना अर्पण ,मोडकी सायकल प्राप्त जाहली तर तीही सद्गुरूंना अर्पण, अश्या प्रकारे प्रत्येक अवस्था त्यांनाच अर्पण करायची सवय लावली पाहिजे.
अशी सवय लावली की आपण मनाने अलिप्त राहायला लागू.श्रीसद्गुरूंचा ध्यास लागायला हवा ,त्यांचे चिंतन ,त्यांचे मनन आपल्यालाही मानसिक धैर्य देते ,नुसते ३५-३६ वर्षे नामस्मरण करून उपयोग नाही. श्रीसद्गुरू स्मरणात श्री सद्गुरूंचे होऊन नाम घेतले तरच जिंकाल.
हे सर्व करताना व्यवहार मध्ये यायला नको , हे हवे ,ते हवे हा भावही मनात यायला नको, तेव्हाच अंतर्मनातील श्रीसदगुरु दर्शन होईल आणि आपणही सद्गुरूमय होऊन जाऊ.
श्रीसद्गुरू काकामहाराज व सौ काकुमाऊली चरणी विनम्र अभिवादन
जय साईराम
No comments:
Post a Comment