सदगुरु म्हणतात ,काही प्रश्न पडले तर नामस्मरण करून झाल्यावर सद्गुरूंना विचार ,सदगुरु नक्की आतून सांगत असतात ,उत्तर देत असतात ,आपल्याला ते ऐकता यायला हवे. काल एक प्रश्न पडला व तो सद्गुरूंना विचारला.
प्रश्न- आपण व्यावहारिक जगात अनेकदा जुने विषय उगाळून काढतो ,त्यामुळे पुन्हा तेच विषय चघळले जातात, ताणतणाव वाढतात , हे कितपत योग्य आहे?
सद्गुरूंचा आतला आवाज - जुने विषय उगाळून काढणे म्हणजे ताणतणाव वाढवणे याव्यतिरिक्त बाकी काहीच नाही ,जसे जुनी भांडी काढली तर लगेच आपण वापरू शकतो का ? नाही त्या भांड्यातील जळमटे काढून टाकावी लागतील , स्वच्छ धुवून घ्यावी लागतील म्हणजे पुन्हा वापरण्यासाठी प्रक्रिया करावी लागते तसेच जुने विचार बासनात गेलेले आहेत ,त्याला जर तर जोडलेले असतात ,त्यावेळी सहन केले हे तुझे प्रारब्द होते किंवा त्यावेळी त्या जीवाने सर्व परिणामांची मनाची तयारी केलेली होती आणि पुन्हा ते उगाळून काढून काहीच फायदा नाही फक्त नंतर हे विषय उकरून काढले तर एकमेकांचा रक्तदाब वाढवण्यासारखे आहे.
जुने जाऊद्या विसरुनी त्याच आयुष्याचा वळणावरती.
पुन्हा उकरून काढून त्याचा काहीही उपयोग नाही ,त्याने फक्त दुःखच वाट्याला येणार.भूतकाळ हा वर्तमानाशी जोडूच नका ,भूतकाळ आता आपण जर बदलू शकणार नाहीत तर त्याचा विचारही करून उपयोग नाही, त्याचा एक फायदा करून घ्या त्यावेळी मी काय चुकीचे वागलो ? आणि तीच चूक पुन्हा नको व्हायला म्हणून माझ्यात काय बदल करायला हवेत हे जाणून घेऊन ते बदल स्वतःमध्ये घडवून आणायचे. भूतकाळाचा असा उपयोग करून घेतला तर खरा फायदा आहे.
यासंदर्भात काही त्रुटी असल्यास ज्येष्ठानी / सदगुरूंनी जरूर मार्गदर्शन करावे.
No comments:
Post a Comment