#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान
आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा
काल Sunil Kulkarni यांनी विचारलेला प्रश्न की बारश्यात नाव ठेवायचा मान बाळाच्या आत्यालाच का मिळतो ? यामागे काही कारण असेल का?
कदाचित ही परंपरा चालू झाली त्यामागे काहीतरी पूर्वजांनी सूक्ष्म विचार केला असेलच ना?
माझ्या मनात काही सुचले ते थोडक्यात मांडतोय
1) कदाचित असे असेल की त्या घरातील लेकरू म्हणजे त्या घरातील मुलगी ,जी लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली असेल किंवा नसेल पण आत्या म्हणून तिला हा मान दिला गेला, कदाचित असा विचार असेल की घरातील वंशपरंपरा चालू ठेवण्यासाठी ,त्या घरातील आत्या म्हणजे जीला आजोबा ,पणजोबा,खापरपणजोबा यांची नावे माहिती आहेत आणि वंशवेल पुढे चालू राहिला अश्या अर्थाने तीच नावे(पणजोबाचे नातवाला व पणजीचे नातीला) पुन्हा ठेवायची प्रथा होती.
2) माहेरवाशीण पुन्हा त्या निमित्ताने घरी येईल ,आत्याचा मान म्हटल्यावर तिला तिच्या सासरहून पाठवणारच. जुन्या काळी माहेरी पाठवायचे प्रमाण फारच कमी होते ,हेही एक कारण असू शकेल.
3) जुन्या काळी बालविवाह होत आणि त्यावेळी सुन लहान वयाच्या असायची,मग त्यावेळी ओल्या बाळंतिणीला मैत्रिणीप्रमाणे सर्व काही समजून सांगणारी आत्या आली व तिच्याकडूनच नाव ठेवले गेले की सुनेचे सासुसासरे (आत्याचा मान म्हणून) खुश , बहीण आली व तिने नाव ठेवल्याने नवराही खुश आणि आपोआप नविन बाळाच्या आगमनाने सर्व घर एकत्र यायचे आणि सर्वच खुश.
4)नवीन पिढीचे आगमन झाले तरीही त्या आत्यालाही मी कोणी वेगळी नाही तर या घराचीच एक घटक आहे हा मानसिक आधार देणारी मुख्य परंपरा म्हणजे बारश्यातील आत्याने नाव ठेवायची परंपरा चालू झाली असावी.
अजून कोणाला काही यावर सुचत असल्यास नक्की सांगा.
- निलेश जोशी
No comments:
Post a Comment