Friday, October 20, 2023

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान २

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

"बारशाच्या वेळी आपण वरवंटा कुंची घालून सजवतो आणि प्रथम तोच कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असे म्हणत पाळण्याच्या वरून खाली 3 वेळा देतो घेतो" या वरवंट्याला काय म्हणतात ?
असे का करतात ?
जाणकारांनी कृपया सांगावे आणि का..?

विज्ञानाला परंपरेची जोड!
कुंची घातलेला वरवंटा त्याला गोपा असे म्हणतात. बाळकृष्ण चे प्रतीक. गोपाळ नाही म्हणत कारण तो दगड अर्थात शिव आहे अशी समज असे.
पूर्वी रेडिमेड पाळणे नव्हते व बाळाला काही धोका होऊ नये म्हणून हा गोपा ठेवून टेस्टिंग करायचे अनोखे तंत्र

गोपा पाळण्यात ठेवायचे कारण म्हणजे वजन टेस्टिंग, आणि प्रथम हा पाळणा आम्ही बाळकृष्ण साठी तयार केला आहे व त्यानेच ह्याची कळजी घ्यावी, येथे वास करावं अथवा आमच्या बाळा सोबत निजावा, रक्षण कराव(टेस्टिंग)

गोप फिरवतात त्याचे कारण म्हणजे, आता सर्वांनी घरी आलेल्या नवीन बाळाला कसे उचलावे, हाताळावे, जपावे हे समजुन घेण्यासाठी. जर १०-१५ पौंड चा गोपा  नीट उचलता आला तर बाळाला सांभाळणे आई,  आजी, आत्या, भावंडं, मामी..यांना सोपे जाईल. (ट्रेनिंग)

अजून एक कारण म्हणजे, हे बाळ आपण सर्वांचे अर्थात पूर्ण कुटुंबाचे आहे ही आपुलकी व्यक्त करणे. नाते जोडणे आणि आशीर्वाद प्राप्त करणे हा सुंदर उद्देश्य होता. 🙏🙏🙏(साभार G Rajesh  )

No comments: