विराट ! एक अद्भुत , अप्रतिम , विराट खेळी !
19 Oct 2023
भारत विरुद्ध बांगलादेश
बांगलादेश टॉस जिंकून फलंदाजी घेतो आणि 50 षटकात 256 धावा करतो.
रोहित आणि गील सोबत धावांचा लिलया पाठलाग करण्याचे असामान्य कौशल्य विराट कडेच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
रोहित आउट झाल्यावर विराट खेळायला आला तेच 2 धावा घेऊन नंतर लागोपाठ 2 नो बॉलमुळे चौकार,षटकार मारत 3 चेंडूत 13 धावावर पोचला. शेवटी श्रेयस आउट झाल्यावर राहुल खेळायला आला तेव्हा बांगलादेश विरुद्ध जिंकण्यासाठी धावा पाहिजे होत्या 26 आणि विराटचे शतक होण्यासाठी हव्या होत्या 26 !
प्रचंड संयम , धिरोदात्तपणा व करारी आक्रमण करीत विराटने ते सहज साध्य केले.यासाठी प्रचंड फॉर्ममध्ये असणाऱ्या के एल राहुल ने कमालीचा संयम ठेवून आणि विराट कोहली एक धाव घेत असताना त्याला एक धाव घेऊ नकोस म्हणून थांबविणारा , विराटच्या दोन धावा व्हाव्यात आणि तो स्ट्राईकवर रहावा यासाठी स्वतः धोका पत्करून जीवाच्या आकांताने पळणारा राहूल भारतीयत्व दाखवित होता. सहकाऱ्याचा सन्मान व संघभावना ( टीमवर्क ) कशाला म्हणतात हे त्याने जगाला दाखवून दिले.
आज अनेकजण विराट विरुद्ध शतक करण्याचा आटापिटा केला असे मीडिया सारखे बोलत आहेत. मोदीनी काहीही केले तरीपण चुकीचेच हे मीडियाचे नरेटीव जसे मीडिया सेट करते तसेच अनेकांच्या पोस्टमध्ये दिसते. विराटने शतक करण्यासाठी काहीही आटापिटा केलेला नाही. संघाला आणि स्वत:च्या शतकाला सारखे रन हवे असतील तर कोणताही फलंदाज दोन्ही पूर्ण करायचा प्रयत्न करेलच ना? Running between wickets उत्तम घेऊन, शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन strike स्वतःकडे ठेवली. एक रनसाठी जर विराटने राहुलला एक ओव्हर टूकुटुकु खेळून काढायला लावली असती तर तो शतकासाठी आटापिटा करतोय असे म्हटले असते,पण रनरेट कमी न करता उलट त्याला गती देत पुढच्या ओव्हर मध्ये strike घेऊन शानदार षटकार ठोकून शतक करणे यालाही धाडस हवे ना ?या शतकाने तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून अजून फक्त एक शतक दूर आहे, उलट wide टाकायचा प्रयत्न करून बांगलादेश बॉलरने मनाचा कोतेपणा दाखवला. विराट कोहली व संपूर्ण भारतीय टीम एकजूट होऊन खेळत आहेत ,आपापसातील हेवेदावे आता दिसत नाहीत आणि हेच या संघाचे यश आहे.आता हे काहीजणांना आणि देशद्रोही विचाराना बघवत नाहीये यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पण भारतीय टीम आणि सर्वच फलंदाज यांना भरपूर शुभेच्छा, विराट कोहलीने या विश्वचषकात सचिनचा विक्रम मोडून ३-४ शतक अजून करावेत हीच सदिच्छा.
- निलेश जोशी
No comments:
Post a Comment