#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५
देवाकडे दिवा लावताना निरांजन, समई, नंदादीप वगैरेत जोडवात, म्हणजे दोन वाती एकत्र करुन एका ज्योतीत लावावा. (प्रत्येक ज्योतीत 2वाती एकत्र करुन)
यात पंचारत, एकारत, जी आरती करताना वापरतात त्यात, पंचारतमध्ये प्रत्येक ज्योतीत दोन वाती एकत्र करुन लावाव्या. म्हणजे 10वाती - 2वातीची एक जोडी.
दिवाळीच्या उत्सवात येणारे सण, वाढदिवसाच्या दिवशी वगैरे जी ओवाळणी केली जाते, त्या तबकातही निरांजनात दोन ज्योती (दोन -दोन वातींच्या) लावाव्या.
सर्वप्रथम दिवा का लावला जातो? याचे उत्तर तुम्हाला शोधावे लागेल!
असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥ (बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28)
उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे "असत्य - अंधार - मृत्यु" हे समान स्वभावाचे असतात. याउलट "सत्य - प्रकाश - अमृत" हे सकारात्मक गुणही समान स्वभावाचे असतात.
तुम्ही असत्य आणि अंधारात जीवन जगत असाल तर मृत्युकडे तुमची वाटचाल होत असते. आणि तुम्ही जर सत्य आणि प्रकाशात जीवन व्यतीत करणार तर अमृत पदाकडे तुमची वाटचाल होत असते.
म्हणून येथे "अज्ञानाचा अंधकार" घलविण्यासाठी आपल्या जीवनात "ज्ञानाचा प्रकाश" आपल्याला निर्माण करावा लागतो. तरच अमृतपद आपले होते, अन्यथा नाही.ज्याप्रमाणे ज्योतिचा प्रकाश हा भौतिक अंधाराला दूर सारून तेथे भौतिक जगताविषयी ज्ञान उत्पन्न करते - त्याच प्रमाणे "सत्याचा प्रकाश" हा मानसिक जगतातील अज्ञान दूर करून अमृतपदाचे ज्ञान आपल्यासाठी उत्पन्न करते. म्हणून ज्योती कडून प्रेरणा घेवून आपण आपल्या मनातील अज्ञान दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी दिवा लावित असतात. त्याकडून प्रेरणा घेण्यासाठी.(आता तुम्हाला किती मोठा दिवा, अन् किती मोठा प्रकाश पाडून किती मोठे ज्ञान निर्माण करायचे हे तुमच्या हातात आहे.)
निरांजनातील जोडवात म्हणजे २ वाती एकत्र लावण्याची परंपरा आहे. याला जिवाशिवाची जोड, जोडा सलामत राहावा, द्वैताचे ( दोन वातींची ) अद्वैत ( एकच ज्योत ) अशी अनेक कारणे सांगितली जातात.दोन वातींची एक ज्योत आजुबाजुचा सारा अंधार नाहिसा करून टाकते... हे एक सुखी प्रापंचिक जीवनाचं द्योतक आहे. नवरा (पुरूष) आणि बायको (स्त्री) यांनी एकत्र येऊन जीवनातील अनेक समस्यावर मात करून संसार फुलवायचा असतो हेच दिव्यातील वात आपल्याला शिकवित असते.
विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विचार करता दोन वाती एकत्रित करून लावण्याच वैज्ञानिक कारण काय असावे? दोन वाती एकत्र लावल्यावर त्या वातींमध्ये असणारी सूक्ष्म पोकळी ही एका सूक्ष्म नलिकेचे काम करते. त्या capillary action मुळे ज्योतीला तेल पुरवठा उत्तम प्रकारे होतो. अन्यथा एकच वात लावणे हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे नाही.
येणारा नवरात्रीचा उत्सव, सर्व गोष्टी नीट समजून घेऊन कुठल्याही भीती वा दडपणाशिवाय भक्तिभावाने साजरा करावा.
II या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: II
- निलेश जोशी
No comments:
Post a Comment