Saturday, July 27, 2013

हिशोब

या जीवनात जगणे महाग झालेय पण मरण स्वस्त झालेय
बॉम्बस्फोट जाळपोळ दंगल यांनी मरणाला सोपा प्रवेश दिलाय

सरकार दिखावा करते आहे जनतेची खुप काळजी घेतेय
दारिद्ररेषेची मर्यादा मात्र दिवसेंदिवस खुप बदलते आहे

मंत्र्याचा कुत्रा मेला तरी शोकसंदेशाचे फलक लावले जाताहेत
उत्तराखंड,लातूर ग्रस्त लोक अजुनही मदतीच्या प्रतिक्षेतचआहेत

सर्वसामान्य जनता आर्थिक विवंचनेने त्रस्त आहेत
सरकार मात्र पाच बारा रुपये जेवणाचे हिशोब मांडत आहे

गृहिणी सहा सिलेंडर कसे पुरवायचे याचा आटापिटा करताहेत
मंत्री लग्नात जेवण हजार की पंधराशे याचे आयोजन करताहेत

दिवसाला तिस रुपये कमावणारा गरीब कसा नाही हे सरकार पटवतेय
स्वत: मात्र संसद भवनात केन्टिनमध्ये जनतेच्या पैश्यावर सूट घेताहेत

दिल्लीच्या मैडम कोणतेही पद नसताना लष्कराची विमाने वापराताहेत
तुम्ही मी मात्र स्वकमाईवरचा कर भरायला रांगेत धडपडतो आहोत

--निलेश जोशी

No comments: