आषाढ़ी एकादशीला गेलो मंदिरात दर्शनाला
रुक्मिणी व पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला
पंत उभे,हार गळ्यात,सोन्याचा शेला कमरेला
विटेवरी होते सज्ज सर्वाना आशीर्वाद द्यायला
मी वाकलो,तुळशी फुले चरणाशी वहायला
कुजबुज ऐकू आली म्हणून लागलो ऐकायला
चक्क पांडुरंग सांगत होते पत्नी रुक्मिणीला
"खुप वेळ झाला पण एकहि भक्त नाही आला"
रुक्मिणी म्हणाली "अहो तुम्ही लागले विसरायला"
"सकाळपासून आहे रांग फ़क्त तुम्हाला भेटायला"
"विसरले तुम्ही त्या भक्तांच्या सहनशाक्तिला"
"उपवासातही तासंतास लागते रांगेत वाट बघायला"
पांडुरंग म्हणाले "हे आले सगळे करार करायला"
एवढे दे,म्हणजे मी येईन केलेला नवस फेडायला
आत्ताच जो नेता येवून गेला,दिली रक्कम मंदिराला
रस्ते धरणाचे पैसे खाऊन दानधर्म करायला आला
थोड़ी तरी बुद्धि त्याने हवी होती वापरायला
जनतेची कामे करण्याला निधी होता खर्चायला
स्वत:ची तिजोरी भरुन देणगी दिली दाखवायला
जनतेची कामे झाली नाही तरी तो दानी ठरला
"जनता हाच पांडुरंग"अरें सांगा कोणीतरी त्याला
मूर्ती आहे फ़क्त प्रतिक,देव आहे सर्व दिशेला
ज्या माणसांना हा नेता बसला आहे लुबाडायला
त्यांनीच निवडून दिले आहे त्याला हे मात्र तो विसरला
जी हीच माणसे आता देती शिव्या त्या भ्रष्ट नेत्याला
निवडणुकीला विसरतील सारे स्वत:च्या सद्दविवेकबुद्धीला
एक दिवसाची सुट्टी घेवुन जातील सहकुटुम्ब फिरायला
निवडणुकीला पैसे खावुन निवडतील त्याच नेत्याला
हेच भक्त मग म्हणतील,देवा वाढ आली महागाईला
स्वत:च्या चूका लपवायला वेठिला धरतील देवाला
आहे विटेवरी पांडुरंग,सदैव आमची काळजी घ्यायला
"देवा आता तूच वाचव"सांगतील प्रत्येक आषाढीला
---निलेश जोशी
No comments:
Post a Comment