Sunday, September 27, 2015

वर्दी

वर्दीतील तुकाराम हवालदार आज सकाळ पासून चिड़चिड़ करायला लागला , कारणही तसेच होते , गणेश उत्सवात लागणाऱ्या बंदोबस्तासाठी साठे साहेबानी त्याची रजा नामंजूर केली होती .
म्हणजे यंदा पण सपत्नीक गावी गणपतीला जायचा मनसूबा रद्द करायला लागणार , गावी गणपतीला जायचे स्वप्न पुनः एक वर्ष पुढेच जाणार.
तुकाराम मालवणकर एकदम शांत शिस्तप्रिय व मनमिळावू गृहस्थाला चिड़चिड़ा पाहिल्यावर सर्व चकित झाले .
त्रागा कमी व्हावा म्हणून चहा प्यायला अण्णा च्या टपरीवर तुकाराम आला व चहा पिता पिता बायकोचे शब्द कानात घुमू लागले , 4 वर्षापुर्वी मूल होत नव्हते म्हणून गावच्या गणपतीला नवस केला व नंतर प्रताप झाला पण नंतरच्या एकाही वर्षी तो केलेला नवस गणपतीला जाउन अजुन फेडता येत नाहीये व कदाचित त्यामुळेच प्रतापच्या प्रगतीत अडथळे येतात ते त्यामुळेच ,
म्हणून यंदा काहीही झाले तरी गावी जायचेच व नवस पूर्ती करायचीच ,
"च्यायला वर्दी घातली की लोकांसाठी जगा , आम्हाला हाये काय इच्छा व पोरंबाळ , यंदा पण सुट्टी कॅन्सल , आता घालतली बायल गाळी आणि गावाहुंन बाबा पण"
अण्णा ऐकून त्याला म्हटला "गणपती हाये तुक्या काळजी घ्यायला , या वर्षी नाय पुढल्या वर्षी जा "

तुकाराम तेथून निघाला ,"हाये गणपती काळजी घ्यायला म्हणे , साला सगळीकडे ऎडजेस्टमेंट करा , उत्सवात लोक मजा करणार आणि आम्ही आहोत दिवस रात्र पहारा देवून याना संरक्षण द्यायला , एवढा करून हे आम्हाला मित्र समजत नाहीच  "
याच तणतणीत व त्राग्य्यातपोलिस स्टेशनकडे जाताना तुकारामला एका उभ्या सूमो गाडीत संशयास्पद अशी माणसे दिसली पण त्याने थोडावेळ तिकडे लक्ष दिलेच नाही , मनात म्हटला "ह्यांच्यासाठी यांच्या सुरक्षेसाठी मरा 14-15 तास रोज , पण एवढे करून आपल्याला सुख नाहीच "
10 पावले चालल्यावर मात्र तुकाराम मधील पोलिस जागा झाला , त्याने लगेच  गाड़ी नंबर लक्षात ठेवला व वॉकी वरुन साठे साहेबाना कळवले
साठे साहेबानाही गांभीर्य समजले  व त्यानी कुमक घेवून येतो हे कळवलेही
थोड्याच् वेळात सर्व प्रयत्नाअंती ती गाड़ी पकडण्यात पोलिसांना यश आले , त्या गाडीत मिळालेली टोळी ही लहान मुलाना किडनैप करणारी टोळी होती व वांटेण्ड होती, आजच तसे आदेश सर्व पोलिस स्टेशन ला देण्यात आले होते व तुकाराम मुळे 3 तासांच्या आत ती टोळी गजाआड़ होती,

साठे साहेबानी सर्व स्टाफला बोलावून कौतुक केले व तुकारामच्या हजर जबाबीपणाचे विशेष कौतुक केले आणि शाबासकी म्हणून गणेश चतुर्थी तील 5 दिवसांची सुट्टीही मंजूर करून टाकली ,

हायसा व आनंदी झालेला तुकाराम घरी जाताना पुनः अण्णाच्या टपरीवर गेला व त्याला पूर्ण समाधानी , आनंदी पाहून अण्णा त्याची ख़ुशी समजून गेला , आणि तुकारामला म्हणाला "काय हाये ना बाप्पावर विश्वास ?"
तुकाराम मनोमन बाप्पाला नमस्कार करून म्हटला "हायेस बाबा माझ्या पाठीशी , बाप्पा मी येणार यंदा दर्शनला , आता प्रतापच्या प्रगतीचेही मार्ग खुले कर, गणपती बाप्पा मोरया "

(लघु-वृत्तीदर्शन....कमीत कमी शब्दात प्रसंग आणि त्यातून मनुष्याच्या स्वभाव व वृत्तीचे दर्शन करण्याचा एक साहित्यप्रकार)

-- निलेश जोशी

No comments: