Sunday, September 13, 2015

गर्दीतील एकटेपण भाग 1

गर्दीतील एकटेपण
विषय वाचला आणि लगेच गाणे आठवले
"रंगुनी रंगात साऱ्या , रंग माझा वेगळा "

माणुस सामाजिक प्राणी आहे , इतर लोकांची,मित्रांची आपल्याला गरज भासते , शेयरिंग करायला मौज मस्ती करायला व दंगा करायला
पण जेव्हा अशी वेळ येते की आपले मन हेच आपल्याबरोबर आहे असे वाटायला लागते , त्यावेळी आजुबाजुला लाखो माणसे असूनही त्या वेळी स्वतशीच् संवाद करायला , भांडायला , शेयर करायला हवे असते आणि यालाच तर म्हणायचे गर्दीतील एकटेपण .
आणि हे एकटेपण जेवढे जास्त काळ अनुभवू अजुनच भयाण व भीषण वाटायला लागते

माझी ही आठवण 3 वर्षपूर्वीची , मी तेव्हा नाशिकला होतो, एप्रिल मध्ये आमचे ऑडिट असते त्याची जोरदार तयारी चालू होती ,रोज थांबून काम चालूच व अशावेळी माझ्या भावाचा फोन आला ,
ताबडतोब गावी ये , आपल्या काकुला हॉस्पिटल मध्ये नेली होती व बीपी कमी होवून वारली.
एकदम त्राण निघुन गेले कारण एकत्र कुटुंबात वाढल्याने जेवढी आईची माया तेवढीच् काकूचीही , लगेच सरांना फोन केला व सांगितले मला अर्जेंट गावी जावे लागतेय, त्यांची परवानगी घेवून मी घरी आलो, घाईत बायकोला फोन केला (ती तिच्या माहेरी चिंचवडला होती)की मी चिंचवडला येतो मग तिथून पुढे गावी कोकणात जाऊ.
रात्री 10 वाजता मी 4व्हीलर चालू केली व पुण्याच्या दिशेने निघालो , डोक्यात सर्व आठवणी लहानपासूनच्या, काकूने केलेले लाड, कौतुक ,रागावणे व सर्वच
मी इकडे गाड़ी चालवतोय , गाणी चालू होती झोप नको यायला म्हणून व डोक्यात असंख्य आठवणींचा कल्लोळ
रात्री 2 वाजता मी चिंचवडला पोचलो , वाटेत भावाचे बायकोचे फोन येतच होते कुठपर्यंत पोचलो म्हणून व काळजी वाटत होती म्हणूनही
पहाटे 2 वाजता चिंचवडला पोचलो , चहा घेतला व बायकोने सांगितले मी बॅग भरेपर्यंत झोप 10 मिनिटे
खरच मी झोपलो ते उठलो सकाळी 6 वाजता
(भावाच्या सांगण्याप्रमाणे बायको व सासुआई दोघानी मला झोप मिळावी म्हणून उठवले नव्हते)
6 वाजता फ्रेश होवून चहा घेवून आम्ही सर्वजण गावी जायला निघालो , वाटेत भावाने फोन करून सांगितले की गावी सर्व आले आहेत व पुढील विधीना सुरुवात केली तर चालेल का ? कारण मला पोचायलाही दुपार झाली असती
मी हो म्हटले व पूर्ण 7 तासांच्या प्रवासात सर्व एकत्र असूनही एकटेपण अनुभवले व संध्याकाळी घरी पोचलो
काका चुलतभाऊ  बाबा आई सर्वाना भेटलो व बोलल्यावर पुनः या एकटे पणातून बाहेर यायला मदत झाली
(याच घटनेच्या 2 दिवसांनी पुनः तसेच एकटेपण अनुभवले ते पुढील भागात)

-निलेश जोशी

No comments: