Sunday, May 24, 2020

दाढदुखी व उदीची महती

श्री सद्गुरवे नमः

दाढेचे दुखणे व उदीची महती

श्रीसद्गुरू काकामहाराज अनेक अनुभव देत असतात ,ते अनुभव आयुष्यात आले की वाटते की खरंच श्रीसदगुरू किती सूक्ष्मातून कार्य करत असतात ,सदगुरु सर्वसाक्षी आहेत याचीच मनोमन खात्री पटते.
      काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू संक्रमण श्रीसद्गुरूंनी आतून आवाज देऊन रोखले,त्यांनतर फोन करून सर्व घटना सविस्तर सांगितली. त्यानंतर सद्गुरुंच्या लीला आणि त्यासमोर आपण केवळ ऋणातच राहू शकतो हे पटले. त्यांनतर अजून 2 अनुभव आले ,त्यातील एक मुलाच्या समर कॅम्प संदर्भात जो नंतर सांगेन . आता जो अनुभव सांगणार आहे तो श्रीसदगुरूंच्या उदीची महती सांगणारा आहे व आजच सकाळी अनुभवायला आला ,आणि पुन्हा एकदा सदगुरुकृपेसमोर नतमस्तक झालो.
     काही महिन्यांपूर्वी माझ्या दाढेच्या सर्जरीवेळी श्रीसदगुरूंनी अवघड काम डॉ ना प्रेरणा देऊन त्यांच्या माध्यमातून सोपे केले. त्यानंतर माझ्या 3 दाढांचे काम चालू होते. डावी अक्कलदाढ जिथे आधी ब्रिज होता तो काढून ती दाढ काढायची होती.डॉ म्हणाले त्या दाढेची दुख कमी झाली की आपण काढू, त्यासाठी औषधे दिली ,दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन होणार अशी कुणकुण लागल्यावर डॉ नी फोन करून मला बोलावून घेतले व माझ्या एका दाताची कॅप बसवली व 2 दिवसांनी दाढ काढायला शस्त्रक्रियेसाठी बोलावले. दरम्यान विषाणू संसर्ग पुण्यात वाढला व दोन दिवसांनी अपॉइंटमेंट होती तेव्हा गेल्यावर म्हणाले की दाढ खोल रुतलेली आहे ,त्यामुळे आता सर्जरी केली टाके पडतील आणि जखम ओली असेल तर विषाणू संक्रमण होण्याची शक्यता जास्त ,त्यामुळे सर्जरी लॉक डाऊन संपल्यावर करूया ,तोपर्यंत गोळ्याच चालू ठेवा. मलाही त्यांचे म्हणणे पटले ,मला वाटले लॉकडाऊन 10-20 दिवसांत संपेल व नंतर सर्जरी करता येईल.त्यांनी अँटिबायोटिक गोळी क्लेवम 600 व एक दुखणे अगदीच सहन नाही झाले तर दुखीवर गोळी दिली.श्रीसद्गुरुकृपेने या काळात फक्त 4 वेळ दाढ दुखली व गोळी घ्यावी लागली.पण मागचे 2 दिवस म्हणजे गुरुवार व शुक्रवार रोज संध्याकाळी हमखास दुखायला लागतेच व त्याबरोबर कानही दुखायला लागला.डॉ ना फोन केला तर म्हणाले 3 मे पर्यंत क्लिनिक उघडणारच नाही, शेवटी दुखल्यावर गोळी हा एकच पर्याय होता.अर्थात हा माझा भ्रम होता कारण श्रीसद्गुरू यांच्या कृपेचा विचार आलाच नाही. त्यात भौतिक गोष्टीत सदगुरु एवढे भरभरून देताहेत मग अजून काय मागायचे? असा विचार करून मी दाढ दुखली की गोळी घेऊन नामस्मरण करायचो.आज पहाटे 3 वाजता दाढ प्रचंड दुखायला लागली म्हणून जाग आली ,नेहमीप्रमाणे उठलो व गोळी घेऊन बिछान्यावर पडलो ,तरीही दुखणे काही थांबायला तयार नाही. अर्ध्या तासाने सहन न होऊन मांडी घालून बसलो व श्रीसद्गुरूंना शरण गेलो ,की सदगुरु माझी दाढ दुखतेय म्हणजे तुम्हालाही त्रास होतोच आहे. मला गोळी घेऊनही त्रास थांबत नाहीये,आता तुम्हीच सर्वेसर्वा असे म्हणून डोळे मिटून सद्गुरुस्मरण केले व मानसपूजा केली व मानसपूजेतच श्रीसद्गुरुसमोर बसून जप करायला लागलो.त्यावर फक्त श्रीसद्गुरूंचा आवाज ऐकू आला ,"अरे ,कोणती गोळी घेतलीस? अँटिबायोटिक गोळी घेऊन दुखणे कसे थांबेल? नीट जाऊन बघ ,दुखीवरची गोळी घेतलीच नाहीयेस,तेव्हा आता जाऊन दुखीवरची गोळी घे ,पाणी पी ,नंतर मी दिलेली उदी आहे ती थोडी हातावर घेऊन ,त्या दाढेवर त्याचे आवरण कर ,दाढेचा बाहेरचा भाग कमकुवत झाला आहे ,उदी लावल्यावर ठीक होईल ,मी आहे ,जा, सांगितले तेवढे कर".
   श्रीसद्गुरू यांचा आवाज ऐकून मी उठलो ,जाऊन बघितले तर मी क्लेवम ही अँटिबायोटिक गोळी घेतली होती ,सोबतची दुखीची गोळी नीट प्रेस्क्रिपशन वाचून घेतली व नंतर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उदी लावून श्रीसद्गुरूना नमस्कार करून बेडवर पडलो. अक्षरश 4 मिनिटात गाढ झोप लागली आणि त्यांनतर आता 12 तासात ती दाढ दुखलीही नाहीये.आज कोणीही मान्य करेल की गोळी घेऊन 3 मिनिटात वेदना थांबणे अशक्य आहे म्हणजेच ही श्रीसद्गुरूंच्या उदीची महती आहे.श्रीसद्गुरू यांनी पुन्हा एकदा सर्वसाक्षीत्वाची प्रचिती दिली आणि दाढेच्या दुखण्यातून वाचविले. श्रीसदगुरु यांच्या चरणी माफी मागतो कारण त्यांना पुन्हा एकदा त्रास दिला, माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे नामस्मरण ,चाकोरी पाळली जात नसूनही श्रीसद्गुरूमाऊलीनी कुपेचा वर्षाव केला, सांभाळून घेतले व प्रत्येक संकटाचे निवारण करायची शक्ती व युक्ती प्रदान करते आहे.श्रीसद्गुरू, असाच सदोदित आशिर्वाद राहू दे. त्रास दिलाच आहे त्याबद्दल माफी असावी.
श्रीसद्गुरू काकामहाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार

जय साईराम
सद्गुरुदास निलेश जोशी

No comments: