एक एक स्थान महात्म्य आपल्याला माहीत नसते ,पण त्याची प्रचिती आल्यावर आपण त्याला शरण जातो,
2 वर्षांपूर्वी मला सतत 6 आठवडे ताप , त्यामुळे नॉशिया आणि वजन घटणे असा तिहेरी त्रास चालू झाला , सर्व टेस्ट झाल्या ,डॉक्टर उपाय ,गोळ्या बदलणे अगदी टायफाईड म्हणून ऍडमिट होऊन 7 दिवस इंजेक्शन कोर्स पण केला ,पण नक्की निदान होतच नव्हते,ताप काही कमी होत नव्हता ,
शेवटी आमच्या कंपनीचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुण्यातील रुबी हॉल येथे ऍडमिट झालो , तेथील डॉ मोदी देवमाणूसच ,त्याने माझ्या सर्व टेस्ट लिहून दिल्या व 4 दिवस सलग सर्व टेस्ट चालू होत्या ,ब्लड,युरिन ,स्टोल ,सोनोग्राफी , एड्स टेस्ट अश्या जवळजवळ 100+ टेस्ट झाल्या पण सर्व रिपोर्ट निगेटिव्ह व ताप कशाने येतो हे गूढच होते,
डॉ मोदी पण संभ्रमित झाले की 4 दिवस वेगवेगळ्या टेस्ट करूनही निदान काहीच नाही व ताप तर सुरूच आहे (दिवसातून 2 वेळाच ताप यायचा व ओसरायचा) मग त्यांनी त्या ताप आलेल्या वेळेत ब्लड सॅम्पल घेतले पण त्याचेही रिपोर्ट नॉर्मल,
बायको ,सासुआई ,भाऊ,आत्या,बहिणी सर्व काळजीत की काय झालंय नक्की?
त्याच दिवशी बायकोची बहीण ,आपली ग्रुप सदस्य Madhavi Hadap-Tagade हॉस्पिटलला आली व त्यांनी सांगितले की बारामतीजवळ एक मारुती ठिकाण आहे ,जागृत आहे व सर्व नवस बोलतात त्या ठिकाणी तुम्ही नवस बोला की सर्व निदान होऊन उपचार होऊन बरे वाटले की सपत्नीक दर्शनाला येऊ ,त्याच्या मुलाच्या आजारपणावेळी असेच निदान होत नव्हते व त्यांना गुण आलेला.
हा आशेचा किरण होता आम्हाला, आम्हीही लगेच हात जोडून नवस बोललो व दर्शनाला येणार असे सांगितले.
लगेच दुसऱ्या दिवशी डॉ मोदी राऊंडला आले व त्यांनी पोटाची सोनोग्राफी व फुल्ल बॉडी सिटी स्कॅन करायला सांगितले व स्कॅन मध्ये त्यांना निदान झाले की फुफ्फुसात गाठ आहे व त्यामुळे ताप येतो , ती गाठ कदाचित कॅन्सरची असेल म्हणून पुन्हा स्कोपी करुन सॅम्पल पाठवले टेस्ट करायला 2 दिवसानी ती टेस्ट निगेटिव्ह आली मग बोन मेरो सॅम्पल पण टेस्ट केले ,अंती निदान झाले व त्यानंतर औषधोपचाराने बरे वाटले ,अजूनही त्यावर गोळ्या उपचार चालू आहेत ,पण ताप येणे कमी आहे.2 वर्षे अपघातामुळे व त्यावरील ट्रीटमेंट , सुट्टी नाही अश्या सबाबीमुळे कण्हेरी दर्शन राहिलेचग पण मागच्या आठवड्यात गोंदवले वरून श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतीरायचे दर्शन घेतले ,नवस पूर्ण केला व अशीच कृपा ठेव अशी प्रार्थना केली .
स्थान महात्म्य सांगायचा उदिष्ट एवढेच की सर्वाना देवस्थानाची महती कळते व अडचणीच्या वेळी याचा फायदा सर्वाना होईल.
No comments:
Post a Comment