अशक्यही शक्य करतील स्वामी
मागील आठवड्यात घडलेली घटना आहे ज्याने खरंच नतमस्तक झालो आणि स्वामींचे मनापासून आभार मानले ,
16 मे ला मुलाची मुंज झाली व त्यानंतर थोडा झालेला पसारा आवरायला थोडा वेळ लागतोच , त्यातच रुटीन मध्ये व्यस्त झाल्याने आवराआवर मंद गतीने चालू होती. त्यात आम्हा तिघांनाही आजारपण , ताप त्यात आठवडा गेला, या सर्वात काही बेसिक गोष्टी मुलाच्या हाताला लागतील अश्या राहून गेल्या.
आता मुल म्हटले की कुतुहूल आलेच आणि त्याने स्टेपलर ओपेरेशन बघून शिकून घेतले होते ,त्यादिवशी मी संध्याकाळी कामावरून घरी आलो व हातपाय धुवून टीव्ही व फेसबुक पोस्ट दोन्ही गोष्टी एकावेळीच चालू होत्या त्यात माझी औषधे आणायला बायको बाहेर गेली ,मुलगा बेडरूम मध्ये खेळतोय एवढेच डोक्यात त्यामुळे मी हॉलमध्ये टीव्ही मोबाईल मध्ये गुंग ,
बायको बाहेरून आली दार वाजल्यावर मुलगा बेडरूम मधून धावत हॉलमध्ये आला व टीव्ही बघत बसला , थोड्या वेळाने मी सहज बेडरूम मध्ये गेलो तर ट्युबलाईट का बंद असे बघितले तर वायर तुटलेली आढळली .
मी आधी ट्युबचे बटण बंद केले ,दुसरा ब्लब चालू केला व मुलाला बोलावून घेतले आणि ती वायर कोणी कापली विचारले तर म्हणाला मीच कापली , मला एकदम शहारा आला, चालू असलेल्या ट्युबलाईटची वायर कापली म्हणजे शॉक लागण्याचा कित्ती धोका होता? तरीही मी बायकोला विचारून किचन मधली कात्री ,सुऱ्या आहेत का विचारले तर सर्व व्यवस्थित होते , मग मुलाला गोड बोलून विचारले की वायर कशाने कापली तर आधी घाबरून काहीच बोलला नाही आणि मग हळूच स्टेपलर माझ्या हातात दिला , स्टेपलरने वायर कापणे कसे शक्य आहे? तरीही मी वायर नीट बघितले तर त्यावर 3 स्टेपल पिन आढळल्या ,म्हणजे त्याने सांगितलेले खरेच होते, खूपच धोकादायक होते हे सर्व कारण जिवंत वायर मेटलच्या स्टेपलरने कापायला किती ताकत लावायला लागेल आणि वायर कापुनही माझा मुलगा एकदम सुरक्षित ,
देवाचे आभार मानले ,मुलाला सर्व समजावले की लाईट चालू असताना त्याला हात लावायचा नाही व बायकोला सांगून आधी सर्व टूल्स व स्टेपलर सारखे स्टेशनरी साहित्य कपाटात ठेवले .
स्वामींचे आभार मानले कारण स्टेपलर ने प्रेस करून वायर कट् व्हायला खरच खूप वेळ लागेल त्यात जिवंत वायर म्हणजे शॉकचा धोका असूनही माझा मुलगा सहीसलामत.
आधी वायर जॉईंट करून त्याला मुलाच्या हाताला येणार नाही अशी वरच्या बाजूला चिटकवली आणि मग मुलाला नीट समजावून सांगितले की शॉक कसा लागू शकतो व काय होईल ते सांगितले (मला सातवीत असताना जबराट शॉक लागलेला की मी वायरला चिकटून होतो व लटकत होतो ,बाबांनी 5 सेकंद उशिरा मेन स्विच बंद असता केला तर तेव्हाच स्वारी म्हणजे मी परलोकात पोचलो असतो)
दुसऱ्या दिवशी पहाटे मला स्वप्नात एक मुंडासे बांधलेले आजोबा होते (स्वामीच ते अजून कोण?) व मला म्हणाले एक गंडांतर टळले (माझा वर्षभरपूर्वीचा अक्सिंडेन्ट)दुसरे अरिष्टही टळले,घाबरू नकोस रे, त्यानंतर मागच्या बाजूला एक आवाज आला त्या दिशेने बघून पुन्हा समोर बघितले तर त्या माळरानावर फक्त मी होतो बाकी कोणीच नाही , जाग आल्यावर मनोमन स्वामींना नमस्कार केला व कामावर गेलो, संध्याकाळी आल्यावर सहकुटुंब स्वामींच्या मठात जाऊन नमस्कार केला व स्वामींचे आभार मानले.
स्वामींची प्रचिती येतेच की ते सतत आपल्याबरोबर असून आपले संरक्षण करत असतातच आणि त्यांचे वचन 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' सार्थ करत असतातच,
अनंतकोटी राजाधिराज योगीराज अक्कलकोटनिवासी परमकृपाळू सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
--निलेश जोशी
No comments:
Post a Comment