संचय म्हणता वृद्धी आली धन,अनुभव ,ज्ञानाची
ठिपका जोडून होते रेघ त्यालाही कारण बिंदूसंचय....
मित्र परिवार ज्ञाती सखे सोबती अपरिहार्य या जगती
अनोळखीही जोडून वाढे हि यादी,हाच तो मित्रसंचय..
क्षण कण वेचून,अनुभव जोडुनी,वाटचाल वार्धक्याची
ठेच वाचवी,करे शहाणा,नव्या पिढीला हा अनुभवसंचय
जुने फोटो,अनेक वस्तू तळातील जागा कपाटामधली
पुन्हा जागतो,अनुभवतो ते क्षण,पाहता हा वस्तू संचय
व्यस्त प्रमाणात वेळ व कामे,गोम हीच आयुष्यामधली
त्यातूनही थोडे व्यक्त होऊनी,वाढवूया स्मृतींचा संचय
क्षणाक्षणाने ठिबकत असते पखाल या आयुष्याची
थेंबाथेंबाने आठवणींचा वाढत असतो स्मरणसंचय.....
-- निलेश जोशी
No comments:
Post a Comment