Tuesday, August 6, 2013

आगमन

काहूर माजले मनात,उत्छवासाचे फ़क्त उसासे
संभ्रम पडतो मनाला,निर्णय खुप दुरवर भासे
विचारांच्या गदारोळात भरकटते मन काहीसे
सर्वच निर्णय वाटतात बरोबर का होते असे?

वागणे माझे असते का योग्य, की चुकीचे?
चुकीचे असेल तर मग ते कसे सुधारायाचे
अवघड सोप्या दोन्ही वाटांमध्ये मन गुंतायचे
कोणता मार्ग योग्य हे ठरवणे अवघड वाटायचे

अशा वेळी फ़क्त तुझी साथ अजमावयाची
तु माझ्या सोबत असण्याची शक्ती घ्यायची
आशीर्वादाने दिव्यत्वाची अनुभूति घ्यायची
देवा तुझ्या सान्निध्यात सर्व दुःख विसरायची

गरज आहे वर्षभर झालेला क्षीण घालवायची
श्रावणानंतर भाद्रपद महिन्याची चाहुल घ्यायची
हीच ती वेळ पुन्हा जोमाने उठून उभे रहायची
श्री गणेशा तुझ्या आगमनाची तयारी करायची

---निलेश जोशी

No comments: