Wednesday, August 14, 2013

देशभक्ती हे पाप असे जर.....

कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.
हे काव्य त्यांनी आपल्या भावना सर्वाना समजव्यात म्हणून लिहिले होते.

देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll

द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll

न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई `
ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी
केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही !
समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर
वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll

भू विभाजने कष्टी झाले त्या व्रणीतांचे करण्या सांत्वन
फास घेतला गळ्याभोवती l परी नाही विचलित माझे मन
दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन
काया जरी हि वडिलोपार्जित l रक्षा कायेची माझे धन
धन ते टाका सिंधूमध्ये अखंडत्व देशा आल्यावर
वेदीवर या राही मी स्थिर ll ३ l।

नथुराम गोडसे

No comments: