Saturday, October 12, 2019

माठ

अनेक पक्षांनी गृहीत धरले सर्व नागरिकांना 
मते द्या यांना नवीन आमदार निवडून देण्या 

नागरिक म्हणुनी अधिकार मोठा मतदानाचा
पण दान देण्या एकही उमेदवार नसे कामाचा

नागरिकांचे भले करण्याच्या नये मारू बाता
फक्त पैसे ओरबड्याण्याच्या नेत्यांचा मनसुबा

अनेक वचननामे आश्वासनांचा पाऊस येथे
त्या पूर्ण होणारच नाही,विश्वास शंभर टक्के

अपूर्ण वचने हवीत पुढील निवडणुकीसाठी
खड्डे,पाणी,अन्न,प्रश्न पुन्हा निवडणुकीसाठी

मतदारांवर विनोद करत असतील सर्व नेते
अनेक फसव्या वचनांना फसतील हे मतदाते

आहे सवय त्यांना करती चिंता प्रतीदिनाची
निवडून आल्या आम्हाच मानतील त्यांचे मंत्री

जातील कोठे शेवटी ,पाच वर्षात पुन्हा गाठ
आमचा असेल तेव्हाही,मतदारराजा हा माठ

-निलेश जोशी

No comments: