15 ऑगस्ट सूर्योदय झाला
69 वा स्वातंत्र्यदिन उजाडला
पण माझ्या बोलण्यात वागण्यात
नेमका काय बदल झाला ?
स्वातंत्र्य होतेच की आधीपासून
बोलण्याचे,विचार मांडण्याचे
समाजात चुकीचे घडते दिसुनही
त्याकडे कानाडोळा करण्याचे
स्वातंत्र्य आहेच की सर्वाना
खोटे वागुन व्यवहार करण्याचे
सर्व मिळून खाऊ वृत्तीला
एकसाथ जोपासण्याचे
स्वातंत्र्य आहेच की आपल्याला
चांगले घडत असूनही
वाईट घडलेले जास्त बघण्याचे
नकारार्थी मानसिकता जोपसण्याचे
स्वातंत्र्य आहे लोकप्रतिनिधिना
स्वार्थी राजकारण करण्याचे
लोकहिताचे निर्णय न घेता
282 करोड़ वाया घालवण्याचे
स्वातंत्र्य आहे शेतकऱ्यांना
आत्महत्या आत्मक्लेश करायचे
किंवा मग सरकार भरोसे न राहता
स्वतःच शेती संवर्धन करण्याचे
स्वातंत्र्य आहेच की जनतेला
नवीन पिढीची दिशा ठरवण्याचे
संस्कार करून येणाऱ्या पिढीला
स्वंयपुर्ण बलवान बनवण्याचे
स्वातंत्र्य तर आहेच सर्वांकडे
आज अचूक वेळ आलीये
कसा अर्थ काढायचा व कसे
वागायचे हे ठाम ठरवण्याची
-- निलेश जोशी
No comments:
Post a Comment