Tuesday, August 9, 2016

सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल

पुस्तके वाचताना काही पुस्तके नुसतीच चाळायची असतात थोड्या वेळातच विसरून जायची असतात तर काही दीर्घ काळ डोक्यात घर करून बसतात .
इंग्रजी भाषेने अशा पुस्तकांच्या खजिन्याची किल्ली एकदा मला मिळवून दिली. कोणीतरी सांगितले आणि सहज म्हणून हाती लागले म्हणूनही मला एक रत्नाचा परिचय झाला.स्टीफन कोव्हे या लेखकाचा. स्वारी त्यांच्या मॅनेजमेन्ट थॉट्स मुळे परिचित आहे पण त्यातही सरताज म्हणता येईल अशा " सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल " या पुस्तकाचा.
मॅनेजमेंट शिकताना मानव या घटकाचा विशेष अभ्यास करायचा असतो. पण आपली मॅनेजमेंट शिकायची सुरुवातच होते ती ऍडम्स स्मिथ च्या टाईम ऍन्ड मोशन वर अधारीत उत्पादन प्रमेयाशी. कारखान्यात काम करणार्‍या कामगाराचा मानव म्हणून विचार करण्याऐवजी एक मशीन म्हणून विचार करायचा. त्याला भावना अहेत नाहीत याच्याशी कर्तव्य नाही.
लीडरशीप बद्दल तर काही विचारु नका. लीडरशीप म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजवायचे हेच आडूनआडून डोक्यात भरवलेले असते
सेव्हन हॅबीट्स्.. हे पुस्तक बराच वेगळा विचार करते . पुस्तक वाचताना लेखकाच्या विचारांशी होतो त्यापेक्षाही स्वतःचाच नव्याने परिचय होतो.
पुस्तकाची सुरुवात करतानाच एक जुने उदाहरण नव्याने पुढे येते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी.........
प्रॉडक्षन आणि प्रॉडक्षन कपॅबीलिटी एह दोन शब्द वारंवार येतात. पी ऍन्ड पीसी
प्रथम त्याबद्दल पाहु. सोन्याचे अंडे हे प्रॉडक्षन मानले तरे ते अंडे देणारी कोंबडी ही प्रॉडक्षन कपॅबिलीटी असते.
उत्पादन आणि उत्पादन करणारे यंत्र. प्रश्न हा येतो की नक्की लक्ष कशावर द्यायचे. कोंबडीवर की सोन्याच्या अंड्यावर?
कोंबडीवर लक्ष दिले तिला उत्तम खाऊपिऊ घातले आणि तिने अंडे दिले नाही तर ते व्यर्थ आहे. आणि कोंबडीकडून सतत नुसत्याच अंड्याची अपेक्षा केली आणि तिला खाऊ पिउ घातले नाही विश्रांती दिली नाही तर कोंबडी मरून जाईल.
एखाद्या लेथ मशीनवर केले जाणारे काम हे उत्पादन मानले तर लेथ मशीन हे प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी आहे. नुसते मशीन चालवत राहिलो तर ते केंव्हातरी मोडून जाईल. मशीनला अधूनमधून विश्रांती दिली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे तर त्याची क्षमता टिकून राहील.
आपल्या शरीराचेही तसेच आहे. नुसते काम केले तर आजारी पडू आपले शरीर( प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी) हरवून बसु. आहाराबरोबरच व्यायाम्/ विश्रांती ( शारीरीक + बौद्धीक ) शरीराला मिळायला हवी.
अशी सुरुवात झाल्यानंतर लेख पुस्तकाचा आढावा घेतो. त्याला तो इनसाईड आउट म्हणतो.
एखादी गोष्ट आपल्याला जशी दिसते ती इतराना तशी दिसेलच असे नाही. एखादा प्रश्न आपल्याला जसा भासतो तो इतराना तसाच भासेल असे नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात. ती आपल्या मतांइतकीच बरोबर असू शकतात्.यासाठी तो एक चित्र दाखवतो. एकाच चित्रात दडलेले दोन वेगळे चेहेरे पाहिल्यावर हे मत सहज पटते.
या नन्तर लेखक सर्वोत्तम प्रभावी व्यक्तींच्या सात सवयींकडे वळतो.या सात सवयी बद्दल त्याने जगातील अनेक व्यक्तींच्या अभ्यासानन्तर लिहिले आहे.
बरेच लोक एका ठराविक मार्गाने जात असतात. कधीकाळी त्याना त्यांची चूक कळते. ते आपला मार्ग बदलतात.
स्टीफन कोव्हे एक मस्त उदाहरण देतो.
एका अंधार्‍या रात्री एक जहाज समुद्रात सफर करत असते. अंधारात नीट दिसत नसते जहाजाच्या कप्तानाला दूरवर एक दिवा दिसतो. बहुतेक दुसरे जहाज असावे. कप्तान रेडीओवर संदेश पाठवतो. आपन एकाच मार्गावर आहोत. धदक होईल तुम्ही मार्ग बदला.
दुसर्‍या बाजूने उलट उत्तर येते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तुम्हीच दिशा बदला. कप्तान चिडून पुन्हा संदेश पाठवतो. आम्ही लढाऊ जहाक आहोत. तुम्ही मुकाट्याने मार्ग बदला. उलट बाजूने उत्तर येते " आम्ही दीपस्तंभ ( दीपगृह)आहोत"
कप्तानाने मार्ग बदलला.
उत्तम सवयी या दीपस्तंभासारख्या असतात. त्या तुम्हाला अंधारात/धुक्यातही मार्ग दाखवतात. दीपस्तंभाशी टक्कर घेण्यात काहीच फायदा नसतो. दीपस्तंभाच्या खडकावर आदळून आपलेच तारु फुटते.
या सात सवयी......खरेतर त्या तशा एकमेकांपासून वेगळ्या करता येणार नाहीत.
पहिल्या तीन सवयी आहेत सेल्फ व्हिक्टरी म्हणजे स्वतः वर विजयमिळवण्यासाठी
दुसर्‍या तीन आहेत त्या सोशल व्हिक्टरी म्हणजे सामाज जिंकण्यासाठी
सातवी सवय वेगळीच आहे. ती या सहा सवयीनी मिळून बनलेली आहे.
पहिली सवय आहे. प्रोऍक्टीव्हीटी......मराठीत याला तेव्हढा योग्य शब्द मिळाला नाही. पण इनिशिएटीव्ह म्हणजे पुढाकार या पेक्षा थोडेसे पुढे जाऊन जी क्रिया येईल तशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत आहे.
लेखक म्हणतो की एखादी गोष्ट स्वतः होऊन सुरु करणे ही एक सवय आहे.
बरेचदा आपण एखादी गोष्ट करतो ती कोणत्यातरी दुसर्‍या गोष्टीची प्रतिक्रिया म्हणून करत असतो. हे करण्यात ती गोष्ट करण्यात काय करावे यावर आपले कोणतेच नियंत्रण रहात नाही. जणू दुसरेच कोणितरी आपले नियंत्रण करत असते.
एखाद्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घेतो. कधी कधी परिणामांचा विचार करून आपण निर्णय घेण्याचे टाळत असतो. पण निर्णय घेण्याचे टाळबे हा सुद्धा एक निर्णयच आहे हे आप्ल्या लक्ष्यात येत नाही.
कृती आणि परिणाम हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादी पेन्सील उचलण्याच्या अगोदर ती कोणत्या बाजूच्या टोकाकडून उचलायची हे आपण ठरवू शकतो पण त्या टोकाकडून पेन्सील उचलताना दुसरे टोकही पेन्सीलच्या सोबतच येते. पेन्सीलीचे एक टोक हे जर कृती मानले तर दुसरे टोक म्हणजे त्या कृतीचे परिणाम असते
कृती करताना त्या कृतीचे परिणाम आपण टाळू शकत नाही. कृती न करणे ही सुद्धा एक प्रकारे कृतीच आहे. त्याचे परिणाम टाळू शकत नाही.
बहुतेकदा आपण केलेले कृती ही एखाद्या कृतीची प्रतिक्रिया असते. .पण मग प्रतिक्रीया कशी करायची त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न पडतो. स्टेफन कोव्हे यावर म्हणतो की प्रतिक्रीया कधीच स्वतंत्र नसते. ती क्रियेवर अवलंबून असते.क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान एक अवसर असतो. त्या वेळेचा वापर करून प्रतिसाद देता येतो. प्रतिक्रीया कशी द्यायची हे आपण ठरवू शकत नाही पण प्रतिसाद कसा द्यायचे हे मात्र आपण ठरवु शकतो.
एखाद्या गोष्टीचा परिणाम आपण आपल्यावर कसा होऊ द्यायचा हे आपण ठरवू शकतो.
शे दोनशे किमी वेगाने येणार्‍या चेंडूला घाबरून विकेट फेकायची ही प्रतिक्रीया झाली चेंडूच्या वेगाचा फायदा घेत त्याला सीमेपार भिरकावून द्यायचे हा झाला प्रतिसाद.
एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतीसाद देणे जमले तर परीणाम आपल्या ताब्यात राहु शकतील.
पुढाकार घ्या असे सांगताना कोणत्या गोष्टीत पुढाकार घ्यायचा हे कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की ज्या गोष्टींवर तुमचे थेट नियंत्रण राहु शकते त्यावर लक्ष्य केंद्रीत करा.
उदा: दिवसभराच्या चोवीसतासात माझ्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात. त्यापैकी माझा ज्यावर ताबा असेल त्याच गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करावे.
टीव्ही वर बातम्या पहाणे , अभ्यास करणे , वर्तमान पत्र वाचणे , राजकारणाची चर्चा करणे. यात अभ्यास करणे या गोष्टीवर माझा कंट्रोल /प्रभाव राहू शकतो कारण टीव्हीवर बातम्या काय येणार आहेत राजकारण कसे चालणार आहे यावर माझा थेट काहीच प्रभाव नसतो
दुसरी सवय : बिगीन विथ द एन्ड इन माईन्ड . शेवट काय करायचा हे डोक्यात ठेऊन सुरवात करा
या सवयी बाबत बोलतान कोव्हे म्हणतो की कोणतेही काम करण्यापूर्वी यातून काय साध्य करायचे आहे ते ठरवूनच मग सुरुवात करा.
जगात कोणतीही गोष्ट दोनदा तयार होत असते. सर्वप्रथम ती मनात आरखडा रूपात बनते मगच ती प्रत्यक्षात येते.
ताजमहाल बनण्यापूर्वी त्याचा आराखडा कोणाच्या तरी मनात उतरला असेल नन्तर तो कागदावर आला असेल मग तो प्रत्यक्षात बनला असेल.
पुढाकार घेऊन कृती करायची ती कशासाठी करायची हे नक्की करायचे. त्यातून काय मिळणार आहे ते ठरवून मग कृती करायची. हे करताना कोणती कृती करायची ते कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की आपल्या रोजच्या व्यवहारात बरीच कामे असतात. त्यात काही तातडीची असतात काही महत्त्वाची असतात. काही तातडीची आणि महत्त्वाची सुद्धा असतात.कोव्हे या कामांची १)तातडीची व मह्त्वाची ,२) कमी तातडीची पण महत्त्वाची, ३)तातडीची पण फारसे महत्त्व नसलेली , ४)कमी तातडीची कमी महत्त्वाची वर्गवारी करतो.
पहिल्या वर्गात बहुतेकदा क्रायसीस प्रकारची कामे असतात. दुसर्‍या गटात मेन्टेनन्स ( फिजीकल / बौद्धीक) येतो.
तिसर्‍या प्रकारा बहुधा सामाजीक कार्यक्रम वगैरे असतात. तर चौथ्या प्रकारात गॉसिपींग चकाट्या या गोष्टी येतात
पैकी दुसर्‍या गटात मोडणार्‍या गोष्टींवर लक्ष्य दिले तर क्रायसीस कमी होतात. आणि काय करायचे ते ठरवता येते.
तिसरी सवय : फर्स्ट थिंग फर्स्ट ......पहिले काम अगोदर करा.
ऐकायला हे वाक्य जरा विचित्रच वाटते पण कोव्हे यात कोणत्या कृतीला अग्रक्रम द्यायचा आणि तो अग्रक्रम कसा ठरवायचा हे सांगतो.
आपण आपल्या जगण्यात कोणती तरी गोष्त केंद्रस्थानी ठेवून आपली धोरणे कृती ठरवत असतो.
हे केंद्रस्थान प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असते. ते कुटुंब , सामाजीक संस्था , नोकरी , धर्म ,मुले पत्नी , मित्र अशा अनेक प्रकारचे असु शकते. कित्येकांच्या बाबतीत शत्रु हे केंद्रस्थान असते. त्यांची प्रत्येक कृती शत्रुला केंद्रस्थानी ठेऊनच घडत असते.शत्रु अमूक करतो म्हणून मी असे करतो. असे त्यांच्या बाबतीत होत असते.
( रावण आणि कर्ण ही या प्रकाराची उदहरणे) आपण अपल्या जगण्याचा केंद्रबिंदू ओळखला तर त्या संदर्भातले काम करायला आपल्याला आवडतच असते. साहाजीक त्यात यश मिळण्याचे प्रमाण अधीक असते.
इतर चार सवयींबद्दल पुन्हा कधितरी.
हे पुस्तक एका दमात वाचता येत नाही. एकेक पान डोक्यात मुरवत जावे लागते . पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच वाचत असतो.
वाचक एक वेगळाच अनुभव घेत जातो. पानागणीक
तो संपन्न होत जातो.

Sunday, August 7, 2016

दिव्यानुभव 3

#दिव्यानुभव

गजानन विजय 18 व्या अध्यायात खामगाव वासी डॉक्टर राजाराम कवर यांची कथा आहे , काहीसा तसाच अनुभव मला स्वतःला आलेला आहे.
हि माझी लग्न व्हायच्या आधीचा अनुभव ,साधारण 2003 ला पुण्यात मी जॉब करत होतो व स्वतःचा फ्लॅट घेतल्यावर तेथे एकटाच राहायचो.
         पायाला अवघड जागी मला फोड आला होता व त्यामुळे चालताना खूप त्रास व्हायचा. फोड लहान होता तोपर्यंत मी कंपनीत जायचोे व डॉक्टरनी दिलेले मलम लावायचो , होईल कमी असे वाटले होते पण हळूहळू फोड खूपच मोठा झाला व त्यात पु झाल्याने खूप वेदना व्हायच्या , तरी पण रोजच्या नामस्मरणात दिवस ढकलत होतो.
एके दिवशी सकाळी उठलो पण चालायलाही जमेना . त्या दिवशी नेमकी पौर्णिमा होती , सकाळी उठून कंपनीत कळवले कि आज येऊ शकत नसल्याने सुट्टी घेत आहे .गादीवर पडून विचार केला कसा हा फोड कमी होणार व डॉक्टर कडे जायचे म्हटले तरी कसे जाणार ?
      साधारण सकाळचे 7 वाजले , घरात असलेले सफरचंद खाल्ले , पाणी प्यालो व अचानक देव्हाऱ्याकडे लक्ष गेल्यावर पौर्णिमा असल्यान गजानन विजय ग्रंथाचेे पारायण करण्याचे मनात आले.अनायासे सुट्टी घेतलीच होती व मन दुसरीकडे गेल्यावर वेदनांचा विसर पडेल हा मूळ उद्देश ,
लागलीच सर्व आवरून आंघोळ करून देवघरात आलो व पूजा करून संकल्प करून पारायण चालू केले , अर्थात एकाच दिवसात पारायण संपवायचे होते , पौर्णिमा होती व भूकही लागली नव्हती ,
हाहा म्हणता संध्याकाळी 6 वाजता 21 अध्याय संपवले .
साधारण 4.40 ला 18 व अध्याय सुरु झाला आणि म्हणताना खूप चूका होऊ लागल्या ,
असे झाले की मी ती ओवी पुन्हा एकदा पूर्ण  वाचतो , 18 व्या अध्यायातील खामगाव वासी राजाराम कवर याना फोड झाला व अंगारा लावल्यावर त्याचा फोड फुटला या वर्णन असलेल्या सर्व ओव्या मला 2-3 वेळा वाचाव्या लागल्या .
सर्व अध्याय संपवले व आरती केली , साखर व सफरचंद नैवेद्य म्हणून दाखवले व पारायण समाप्ती केली.
शांतपणे बसलो असता पारायण वाचताना मी जेवढ्या अगरबत्ती लावल्या होत्या त्याचा अंगारा एका डबीत भरून ठेवला व  क्षणात आठवले 18 व्या अध्यायातील चूक झाल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचलेल्या ओव्या , गजानन प्रसाद अंगाऱ्याने जर राजाराम कवर बरे होऊ शकतात तर पारायण करताना जमलेला अंगारा हाही गजानन प्रसादच आहे .
मी क्षणभर शहारलो व तो अंगारा हातावर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून माझ्या झालेल्या फोडावर चोळला  व थोडा अंगारा पाण्यात मिसळून तीर्थ म्हणून प्यालो,
थोड्या वेळाने बाहेर जाऊन चहा , नाष्टा केला व थोडी फळे घेऊन घरी आलो .
21 मोदकाऐवजी 21 फळांचा नैवेद्य दाखवला व बेडवर पडलो आराम करायला , शांत झोप लागली साधारण 9 वाजता जाग आली तेव्हा लक्षात आले फोड फुटून साफ झाला आहे व वेदनाही कमी झाल्यात .
महाराजांना नमस्कार करून त्यांना दाखविलेल्या नेवेद्यातील काही फळे प्रसाद म्हणून खाल्ली व पुन्हा नामस्मरण करत झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी खूप आराम पडला होता व कामावर सुद्धा जाऊ शकलो व पुढील 3-4 दिवसात तो फोड निमुन सर्व त्रास नाहीसा झाला.

जय गजानन , गण गण गणात बोते

Friday, August 5, 2016

दिव्यानुभव 1

#दिव्यानुभव

अगदी कालपरवा आलेला अनुभव
2 महिन्यापासून अपघात झालेने हात सर्जरी व पाय खोल जखम curing rest चालु आहे , त्यात 2 महिन्यात कितीवेळा मनात विचार आला,
असा  किती त्रास सहन करायचा तरीपण या परिक्षेत उतरायचेच असे ठरवले.
श्रावण चालू झाला 3 ऑगस्ट2016 पासून
त्याआधी 2 दिवस म्हणजे 30 जुलै पासून मनात विचार आले घरीच आहोत तर गजानन विजय पारायण करू , सोमवार माझा उपास असतो त्यामुळे सोमवार सुरुवात करून गुरुवारी संपवू व काहीतरी नैवेद्य करू , पण सध्या ड्रेसिंग चालू असल्याने रोज हॉस्पिटलला जायला लागते व पाऊस,ट्राफिक यामुळे अडचणी येतच होत्या व यायला उशीर झाल्याने 1 दिवस पुढे ढकलला गेला , म्हणजेच संकेत होता का?  कि श्रावणात कर पारायण ,
माहित नाही पण 2 ऑगस्टला ठरवले की उद्यापासून सकाळी उठून पारायण करायचेच ,
स्वामी आपल्याला बुद्धीही देतात व परीक्षाही बघतात, तशीच परीक्षा अनुभवली ,
रात्री सकाळी तयारी केली , बाथरूम मध्ये खुर्ची (बँडेजमुळे पिशवी बांधून पाय वर ठेवून अंघोळ करावी लागते)कपडे ठेवण्यापासून सौच्या मदतीने तयारी झाली , अलार्म लावला व सकाळी दूधवाला 4.45 ला येतो त्यानंतर अंघोळ करून मी पारायण करायला बसणार पण का कोण जाणे ? पहाटे 4.40 ला दूध घेतले व बाथरूम मध्ये गिझर चालू करायला गेलो तर लाईट गेले व पाणीही गेले ,
नाईलाजाने वाट बघणे आले , मी पुन्हा बेडरूम मध्ये येऊन लाईट यायची वाट बघतोय तर 6.30 ला लाईट आली , त्यानंतर पाणी येऊन गिझर लावून अंघोळ करून पारायण करायला बसायलाच 7.15 वाजले ,
घरातील देवांची पूजा केली व पारायण संकल्प करून अध्याय वाचायला सुरुवात केली , साधारण 10.30ला
6 अध्याय वाचून झाले व का कोण जाणे ग्लानी व झोप यायला लागली , अंगात तापही होता , सौ म्हणाल्या हीच तर परीक्षा आहे पण ताप व ग्लानी येताना पारायण नको , गोळ्या चालू आहेत त्यामुळे पण त्रास होत असेल थोडा आराम कर,
मी स्वामींना नमस्कार केला ,पोथी बाजूला ठेवली व बेडवर जाऊन पडलो .
क्षणार्धात गाढ झोप लागली जसे आपण रात्री झोपतो तेवढी गाढ झोप ,
दरम्यान चिरंजीव शाळेत गेले , सौं चा स्वयंपाक तयार झाला पण मला जाग नाही ,
साधारण दुपारी 1.30ला मला जाग आली पण त्यावेळी काहीतरी स्वप्नात बघितले म्हणून मी उठलो .
झोपेत मी स्वप्न बघितले की गजानन संस्थान वेबसाईट मी बघतो आहे , गजानन महाराज पूर्ण लाईव्ह दर्शन घेतले मी त्या साईट वर व नंतर एक आवाज ऐकू आला की साईटवर अभिषेक पावती पैसे ऑनलाइन भर,
तसेच आता उठल्यावर नैवेद्य दाखवून मगच जेवायचे .
मी बायकोला बेडवरून आवाज दिला व तिला म्हटले अग नैवेद्य दाखवून मग जेवूया.
पण तिने म्हटले की स्वयंपाक झालेला आहे पण मुलगा शाळेत जाताना खाऊन गेला , डबा घेऊन गेला तसेच मीही भाजी पोळी खाऊन घेतली भूक लागली म्हणून , त्यामुळे तो नैवेद्य दाखवणे बरोबर नाही , तिथेही परीक्षा ,
मग दूध साखर नैवेद्य दाखवला व जेवून हॉस्पिटलला ड्रेसिंग बँडेज करायला गेलो,
ट्राफिक पाऊस यामुळे यायलाच 6 वाजले अर्थात पारायण करणे दुसऱ्या दिवसापासूनच करायला लागणार . संध्याकाळी आठवणीने ऑनलाइन अभिषेक पावती पैसे भरले शेगाव संस्थान वेबसाईट वर व निश्चिंत झालो.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्टला सकाळी छान उठलो , पूजा करून पारायण चालू केले , छान पाऊस , हवेत गारवा 7 ते 9 असे 2 अध्याय वाचून झाले व खूप थंडी वाजायला लागली , ताप भरला व कालच्यासारखीच ग्लानी येऊ लागली. उठून तोंडावर पाणी मारले व गोळी घेतली , अध्याय क्रमांक 14 पर्यंत सर्व अध्याय मोठ्याने वाचून पूर्ण केले पण नंतर राहवेना म्हणून थांबवून नमस्कार केला व बेडवर झोपायला गेलो.(या आधी मी हे पारायण 2 दिवसात संपवणार व गुरुवारी गोड नैवेद्य कर असे सौ.ला सांगितले होते पण महाराजांना 3 दिवसात पारायण करून घ्यायचे असेल , तसेच डॉ दिलेल्या हाय अँटिबायोटिक्स मी आधीही घेत आहे पण अशी ग्लानी झोप प्रकार झाला नाही ) म्हणजे पुन्हा परीक्षाच ,त्यानंतर पुन्हा हॉस्पिटल बँडेज करून लवकर येऊनही मी महाराजांची इच्छा म्हणून अध्याय वाचले नाहीत.
काल 5 ऑगस्ट मात्र खूप छान सर्व अध्याय वाचून पूर्ण झाले व मनासारखा स्वामींना नैवेद्य दाखवून आरती पारायण सांगता मनासारखी झाली.
सांगण्याचा उद्देश कर्ताकरविता महाराज आहेत व ते सेवा करून घेतात , त्यात आपल्या हातात काहीच नाही , आपण निमित्तमात्र व असे असतानाही आपली खडतर परीक्षाही चालूच असते. त्या सर्वांना तोंड देत परीक्षेत उतरलो तरी महाराजांचा आशीर्वाद मिळाला असे मला वाटते.
लेख खूपच मोठा झाला म्हणून थांबतो , धन्यवाद

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय

Monday, August 1, 2016

दिव्यानुभव 2

#दिव्यानुभव

मी मुंबईत एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होतो तेव्हाची गोष्ट साधारण सप्टेंबर 2003
पंजाब इथे दिलेल्या काही प्रॉडकट मध्ये पार्टस फ्री ऑफ कोस्ट बदलून द्यायचे कंपनीने ठरवले , कारण तसे नसते केले तर ते प्रॉडकट फ्लॉप झाले असते व कोणीही कोर्टात जाऊ शकले असते
या कामासाठी साधारण 7 टीम बनवल्या त्यात माझ्याकडे एका टीमची जबाबदारी
पूर्ण टीम हॉटेल बुकिंग तेथील प्रवास खर्च मलाच करायचा होता म्हणून कंपनीतून 80000 ऍडव्हान्स घेतला
राजधानी एक्सप्रेस चे बुकिंग झाले होते त्याच दिवशी संध्याकाळी निघायचे होते
मनात खूप भीती , एकट्याने एवढा लांबचा प्रवास व एवढे पैसे जायचे कसे ?
मी मनात स्वामी व गजानन महाराजांचे स्मरण केले व यात तुम्हीच मला सांभाळा अशी मनापासून प्रार्थना केली
कंपनीतून घरी निघालो व मालाड स्टेशन जवळील साई मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तेथेही स्वामी व गजानन।महाराज व साई महाराज यांना मनापासून नमस्कार केला व बाहेर आलो तर ICICI बँक ATM दिसले अचानक मनात विचार आला येवढी रक्कम न नेता माझ्या अकाउंटला भरायची व लागेल तशी ATM मधून काढता येईल .
लगेच जवळच्या ब्रँच मध्ये जाऊन माझ्या खात्यावर 75000 भरले व सोबत 5000 ठेवले .
थोडे हायसे वाटले , आता प्रवास चालू कधी होणार ही उत्सुकताही होतीच,
राजधानी एक्सप्रेस एक आलिशान व फास्ट गाडी, मी तिकिटे व बॅग घेऊन व पुन्हा सर्व चेक करून CST ला आलो
दुसऱ्या दिवशी 11 ला गाडी दिल्लीला पोचणार व दुपारी 54 वाजता शताब्दी पकडून जालंधर ,त्याचेही तिकीट कन्फर्म होते
आता प्रॉब्लेम एकाच होता राजधानी जाणार नवी दिल्ली स्टेशन वर व हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून जालंधरसाठी ट्रेन
काय होईल बघतील स्वामी असा विचार करून राजधानी एक्सप्रेस मध्ये बसलो ,
पूर्ण रात्र प्रवास न्जॉय केला व सकाळी जाग आली तेव्हा मात्र टेन्शन यायला लागले , नवी दिल्ली ते हजारात अंतर किती वैगरे काहीच माहिती नाही , भर एसी गाडीत मला घाम सुटला , मी पुन्हा स्वामी व गजानन महाराज यांचे स्मरण केले व मनातल्या मनात गजानन बावंनी म्हणायला लागलो, साधारण तासाभराने दिल्ली स्टेशन येणार होते व इतक्यात एक गृहस्थ येऊन आमच्या कंपार्टमेंट मध्ये बसले , मी कालपासून त्यांना नव्हते पाहिले पण मग वाटले माझ्या प्रवासाच्या धुंदीत नसेल गेले लक्ष , त्यांच्याकडे बघितल्यावर माझ्याकडे त्यांनी बघितले व स्मितहास्य केले , मग हळूहळू कुठे जाणार etc गप्पा चालू झाल्या व मी त्यांना माझा गाड्यांचा प्रॉब्लेम सांगितलं
ते म्हटले ते न्यू दिल्लीला उतरून पुढे कारने जाणार आहेत तेव्हा वाटेत हजारात निजामुद्दीन स्टेशन लागेल तेथे उतर व पुढे गाडी पकडणे सोपे जाईल
जिवात जीव आला पण दिल्ली ठग असतात तसाच कोणी नाही ना अशी शंकाही आली पण नंतर देवावर सोडून मी त्यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला
स्टेशन आले , त्यांच्या मागोमाग मी जायला लागलो , स्टेशन बाहेर अनेक टॅक्सी होत्या व लोक धावून बॅग घेत होते पण ते म्हटले की इकडे टॅक्सी महाग सांगतात आपण बाहेरून टॅक्सी करू , असे म्हटल्यावर मी त्यांच्याबरोबर स्टेशनच्या बाहेर आलो , त्यानी टॅक्सी केली ,मीही बसलो , मला ते निजामुद्दीन स्टेशनबाहेर पोचवून मला म्हणाले घाबरू नको , इथे क्लॉकरूम असेल तिथे बॅग्स ठेवून बिनधास्त आजूबाजूला फिरून ये , सर्व प्रवास व्यवस्थित झाला ना या पुढेही होईल .
मी त्यांना रिक्वेस्ट केली की काका तुमचा नाव व मोबाईल नंबर द्या व मी हॉटेलवर पोचल्यावर फोन करून सांगेन व मनातल्या मनात त्यांना नमस्कार केला.
त्यांनी छान स्मितहास्य केले व मी दिलेल्या पॉकेट डायरी मध्ये सुवाच्च अक्षरात नाव गणेश व मोबाईल नंबर लिहून दिला.

प्रवास सुखरूप झाला व रात्री हॉटेलवर पोचल्यावर त्या नंबर वर फोन करत होतो पण नंबर अस्तित्वात नाही सांगू लागले . विचार केला नेटवर्क बिझी असेन उद्या करू , त्यांनतर जवळपास 2 महिने मी तो नंबर लावण्याचा प्रयत्न केला तर तेच उत्तर हा नंबर अस्तित्वात नाही . मला मार्ग दाखवायला स्वतः गजानन महाराज आले होते हे नक्की .

जय गजानन
।। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ।।

Monday, July 18, 2016

शह प्रतिशह

#केव्हीडीकल्पनाविस्तार

"I beg to disagree !" अतिशय मंजुळ पण आत्मविश्वासपूर्ण आवाज कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला आणि आपल्याच प्रेझेंटेशनमध्ये गुंगलेल्या हर्षदने अविश्वासाने मागे वळून पाहिले!

हर्षद क्षीरसागर, HK ग्रुपचा चेअरमन. फर्स्ट जनरेशन बिझिनेसमन. सेल्फ मेड मॅन. कोट्याधीश. आपले कोणतेही निर्णय कधीच चूक नसतात ह्याचा अभिमान बाळगणारा. आणि काही चुकले तरी "मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया" ह्या टेचात वावरणारा. थोडक्यात आलम दुनियेला फाट्यावर मारून आपल्याच धुनकीत जगणारा मस्त कलंदर. त्याला विरोधाची सवयच नव्हती. त्याचे मुख्य कारण असे की त्याला विरोध करायचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अक्कल असणे आवश्यक होते किंवा नोकरी गमवायची तयारी आवश्यक होती. ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव स्टाफ मेम्बर्सपैकी प्रत्येकात असल्याने कोणी त्याच्या वाटेला जात नसे. हर्षदही शक्यतो धंद्यात चुकत नसे. त्याचे आजवरचे बहुतेक निर्णय लॉन्ग टर्म मध्ये योग्यच ठरले होते. जे चुकले त्यातून त्याने स्वतः धडे घेतले होते. पण आजवर त्याला तू चुकतो आहेस हे सांगणारे ऑफिसात कोणीच भेटले नव्हते. त्यामुळे ते वाक्य ऐकून हर्षद अविश्वासाने मागे वळला. कॉन्फरन्स रूममध्ये दडपणयुक्त शांतता पसरली!

त्या आवाजाच्या दिशेने पाहात हर्षद म्हणाला "come again please!"

तोच आवाज आणखी निर्धाराने आला "मला हा निर्णय कंपनीच्या हिताच्या दृष्टीने जरा रिस्की वाटतो आहे. This will impact the top line badly and also the reputation of the organisation!"

मानसी पटवर्धन, फक्त हुशारीच्या जोरावर सीए आणि एमबीए करून दहा वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन HK मध्ये व्हीपी फायनान्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. HK मध्ये, विशेषतः हर्षद समोर डेसिग्नेशला फारसा अर्थ नसे. हर्षदने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पाचशेच्या वर स्टाफ पगार घेत होता. त्याच्या दृष्टीने त्यातीलच एक "जरा जास्त पगार घेणारी" ह्या पलीकडे फारसे महत्व नसलेली बाई आज त्याला मॅनेजमेंट टीम समोर चॅलेंज करत होती. चक्क तू चुकतो आहेस असे खुल्ला सांगत होती!

"ओह. आपण जे काही म्हणालात ते जरा डिटेल मध्ये समाजवाल का आम्हा सर्वांना?" इतके कुत्सितपणे म्हणत हर्षद त्याच्या गुबगुबीत चेयरमध्ये कॉफी सिप करत बसला आणि मानसीला समोर येऊन बोलायची त्याने सूचना केली. मानसी शांतपणे चालत पुढे आली आणि हर्षदचेच प्रेझेंटेशन एक एक स्लाईड करत दाखवत, त्यावर आपले मत मांडत आपले मुद्दे डेटा पॉइंट्ससह शाबीत करत गेली. हर्षदला तिची हुशारी, आत्मविश्वास, ज्ञान आणि मुख्य म्हणजे हिम्मत ह्याचे मनोमन कौतुक वाटत होते. तिचे प्रेझेंटेशन संपले. हर्षद हातात पेन फिरवत, पेनाकडे बघत विचारात गुंगला होता. दोन मिनिटे शांततेत गेली. सगळेजण हर्षदच्या प्रतिसादाची वाट बघत होते. अचानक हर्षद उठून उभा राहिला. बाकी सर्व लगबगीने उठले. "Gentleman let me think through this. Wait for my mail tomorrow." इतके म्हणून हर्षद निघून गेला. जाताना फक्त एक कटाक्ष मानसीकडे टाकून. ती शांतपणे आणि त्याच आत्मविश्वासाने उभी होती. सुंदर चेहर्यावर मोहक स्माईल लेऊन.

हर्षदने पूर्ण अभ्यास केला , मानसीने सुचवलेल्या बदलांची शहानिशा करताना त्याला 3 गोष्टी विशेषाने जाणवल्या ,
1. मानसी पूर्णपणे दूर उभी राहून प्रेझेन्टेशन ऐकत असतानाही तिने चाणाक्षपणे कमकुवत मुद्दे हेरले होते
2. आता जॉईन झालेली कोणतीही व्यक्ती एवढ्या फटाफट मॅनेजमेंट डिसीजन खाचखळगे ओळखू शकणे कठीण होते
3.तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगत होता कोणीतरी गॉडफादर आहे तिचा

आता या कठपुतळीमागचा खरा सूत्रधार शोधणे त्याला अनिवार्य वाटले , छान पैकी कॉफी घेऊन तो बाहेर लॉनवर आला , विचार करू लागला मला काटशह देऊन कोणाला फायदा होऊ शकतो ? त्यात 3 नावे समोर आली , त्याचा चुलतभाऊ हरीश क्षीरसागर ,त्याचे काका हरीलाल क्षीरसागर व त्याचा बिजनेस पार्टनर अंकित अगरवाल.
शान्त डोक्याने हर्षद आत आला व त्याने लॅपटॉप उघडून मेल लिहिला कि मानसी यांचे अभिनंदन कि त्यांनी कंपनीच्या दृष्टिने विचार करून आपले मत सांगितले तरीही मानसीचे मुद्दे बरोबर नाहीत व त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे , दरम्यान प्रोजेक्टला वेळ असल्याने सर्व स्टाफला या प्रोजेकट सक्सेस रेट बद्दल काय वाटते व काही सूचना असतील तर त्या देण्यासाठी सजेशन बॉक्स व इपोर्टल वर ब्लॉग चालू करण्यात येईल त्यात सर्वानी आपले मत सांगावे.

त्याने दुसरी महत्त्वाची इन्फो चेक केली अंकित अगरवाल पार्टनरशिप डॉक्युमेंट पण त्यात त्याला काहीही वावगे आठळले नाही , अंकितची मार्केटमधील पत पण घसघशीत होती व आजपर्यंत त्याने कोणताही बिजनेस पार्टनर्शीप करून गिळला नव्हता,
तसेच त्याने हरीश व हरीलाल यांचे शेअर संदर्भात कँलकुलेशन केले व त्याला थोडी कल्पना आली तरी ती व्हेरिफाय करण्यासाठी त्याने IT हेड निलेश ला बोलावून घेतले , दोघानी मिळून मानसी जॉईन झाल्यापासून तिला आलेले मेल्स, मोबाईल कॉल व इतर संदर्भ चेक केले , आणि त्याला जाणवले की मानसी खरंच एक बाहुली आहे व तिला नाचवले जातंय दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर ,

निलेश गेल्यावर हर्षदने मानसीला बोलावून घेतले , तिच्याशी सर्व मुद्दे पुन्हा डिस्कस करताना खूप प्रश्न विचारले , काही मेल संदर्भ व डेटा दाखवताना अचानक त्याला जाणवले मानसी प्रचंड दडपणाखाली आहे , मग त्याने लॅपटॉप बंद करुन मानसीला सर्व कल्पना दिली , तिला हेही सांगितले की आजपर्यंत माझ्या विरोधात गेलेला कोणीही कंपनीत टिकणार नाही इव्हन तीही ,
तिला त्याने सांगितले की सर्व मेल्स कॉल तपासून तो हे बोलत आहे , एवढे सांगितल्यावर मानसी एकदम बावरून गेली , तिने एकदा सर्व ऑफिसमध्ये नजर फिरवली व मान्य केले की हे सर्व तिच्याकडून करून घेतले जात आहे , हरीश हिरालाल दोघेही नावाने HKच आहेत पण हर्षदला बाजूला करून स्वतः HKचे मालक बनू इच्छित आहेत व त्यासाठी तिचा वापर करून घेतला जात आहे .
आता हर्षदने शोधून काढलेले सर्व दुवे जुळून आले व त्याने मानसीला ऑफर दिली , या सर्वात तिने न पडता राजीनामा देऊन निघून जावे , त्याबदल्यात अंकित अगरवालच्या कंपनीत तिला जॉब दिला जाईल व आर्थिक मदतही  पण त्याबदल्यात तिने स्वतःचे फायनान्सचे स्किल पणाला लावून हरीश व हिरालाल यांचे शेअर जे बेरजेने 49 टक्के होतात ते 5% नेऊन ठेवायचे . म्हणजे पुन्हा अनभिषिक्त मालक हर्षद होईल व प्रतिशह पण बसेल .
अर्थात मानसीला हे मान्य करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता व त्यामानाने हर्षदने दिलेली ऑफर सुरक्षित होती. तिने 2 दिवसाचा अवधी मागितला व केबिनबाहेर निघून गेली .
       2 दिवसांनी हर्षदच्या मेलबॉक्स ला 3 मेल होते जे वाचून हर्षद आपल्या नावाप्रमाणे आनंदित झाला
1. IT हेड निलेश मेल - प्रोजेकट इपोर्टल रेपोन्स चांगला आहे व खूप चांगले सजेशन्स येत आहेत , सर्व स्टाफ आपल्याला निर्णयात सामील करुन घेतले जाते आहे म्हणून आनंदित आहे.
2. मानासिचे रिजाईन लेटर त्याच्या अप्रोवलसाठी पेंडिंग आहे.
3. मानसीचा पर्सनल मेल थँक्स गिविंगचा व सांगितलेली जबाबदारी (प्रोजेकट 49 to 5 )पूर्ण झाला आहे.

-- निलेश जोशी

Wednesday, July 6, 2016

आधुनिक बहिणाबाई ओव्या

अरे संसार संसार जशी कणिक रोटीमेकरवर
आधी प्रेस व्हावे लागे तेव्हा बनते भाकर

अरे संसार संसार , शिळे जेवण ओव्हनवर,
सेट  करी 3मिनिटे, गरम जेवण ताटात

अरे संसार संसार , नको वाटण घाटण,
विद्युत चक्की तो मिक्सर , येई धावून लगोलग

अरे संसार संसार , झाडलोट नक्को बाई
चुटकीत होई साफ ,फिरवता व्हॅक्युम क्लीनर

अरे संसार संसार , धोबीघाट कित्ती त्रास
हाताशी वॉशिंग मशीन , धुणे करी सुसह्य

अरे संसार संसार , नाही वेळ घालवण्या साधन
टीव्ही वायफाय मोबाईल , स्मार्ट असे न्यू वुमन

-- निलेश जोशी